शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकेच्या गाळ्यांची परस्पर विक्री...!

By admin | Updated: January 5, 2016 00:04 IST

रवी गात , अंबड अंबड नगरपालिकेने भाडेकरार पध्दतीने दिलेल्या अनेक दुकानांचा भाडेकरार संपुष्टात येऊन कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही या दुकानांचा पुनर्लिलाव केला नसल्याने

रवी गात , अंबडअंबड नगरपालिकेने भाडेकरार पध्दतीने दिलेल्या अनेक दुकानांचा भाडेकरार संपुष्टात येऊन कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही या दुकानांचा पुनर्लिलाव केला नसल्याने पालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडत आहे. एकीकडे नागरिकांनी विकासकामांची मागणी केली असता पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे सांगायचे व दुसरीकडे पालिकेतील काही जणांचे व्यापाऱ्यांशी असलेले हितसंबध सांभाळण्यासाठी या दुकानांच्या पुनर्लिलावाची प्रक्रिया लांबवायची अशा दुटप्पी पद्धतीने सध्या पालिकेचा कारभार सुरु असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे.अंबड नगरपालिकेच्या मालकीची ९३ दुकाने ठराविक कालावधीच्या भाडेतत्वावर व्यापाऱ्यांना दिलेली आहेत. याबरोबरच पालिकेच्या जागेवर एकूण ६५ दुकाने सध्या भाडेतत्वावर सुरु आहेत. पालिकेला मिळणाऱ्या महसुलात भर पडावी व गरजू व्यापाऱ्यांना आपल्या उद्योग-व्यापाऱ्यांसाठी या दुकानांचा लाभ व्हावा अशा दुहेरी हेतूने पालिकेने ही दुकाने व जागा भाडेतत्वावर व्यापाऱ्यांना दिली. पालिकेने व्यापाऱ्यांशी ठराविक कालावधीचा भाडेकरारही केलेला आहे. यापैकी काही दुकानांचा ३० वर्षाचा, काहींचा ३ तर काहींचा ५ असा वेगवेगळ्या कालावधीचा भाडेकरार पालिकेसोबत झालेला आहे. यापैकी अनेक दुकानांची भाडेकराराची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानाचा ताबा नगरपालिकेला देणे बंधनकारक आहे. जर व्यापारी स्वत:हून दुकानाचा ताबा पालिकेला देत नसतील तर पालिका प्रशासनास दुकानाचा ताबा घेण्याचे अधिकार आहेत. मात्र पालिकेतील अनेकांचे व्यापाऱ्यांशी हितसंबंध गुंतलेले असल्याने भाडेकरार संपून कित्येक महिने उलटून गेल्यानंतर अद्यापही पालिकेच्या मालकीच्या दुकानांवर व्यापाऱ्यांचा ताबा कायम आहे. विशेष म्हणजे भाडेकराराचा मुदत संपल्यापासून सदर व्यापारी पालिकेच्या मालकीच्या दुकानांचा मोफत वापर करत आहेत. आजच्या काळात लाखो रुपयांचे भाडे मिळवू शकणारी ही दुकाने व्यापारी नाममात्र दराने अथवा मोफतपणे वापरत आहेत. पालिकेचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही व्यापाऱ्यांनी अंबड पालिकेकडून नाममात्र दराने भाडेकरार करुन दुकाने ताब्यात घेतली व नंतर या दुकानांची परस्पर विक्री करुन टाकली. पालिकेच्या मालकीची दुकाने काही महाभाग भाडेकरुंनी विकली तशीच ती दुकाने अंबड पालिकेच्या मालकीची आहेत हे माहिती असतानाही काही महाभागांनी ही दुकाने भाडेकरु व्यापाऱ्यांकडून पैसे देऊन खरेदी केली हे विशेष.यातील आणखी धक्कादायक प्रकार म्हणजे हे सर्व होत असताना पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना याची संपूर्ण माहिती मिळाली होती अशी चर्चा आहे, मात्र कोणीही हा सर्व प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला नाही.