शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा- बायकोची उडाली झोप; संशयामुळे वैवाहिक आयुष्य पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:22 IST

नवीन जोडप्यांमध्ये मोबाईलमुळेच होतोय सर्वाधिक कलह

- राम शिनगारेऔरंगाबाद : व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियामुळे नवरा- बायकोंमधील संवाद कमी होत आहे. सोशल मीडियावर शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींसोबत चॅटिंग केली जाते. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला आहे. याविषयीच्या तक्रारींचा ओघच भरोसा सेलकडे दररोज येत आहे.

पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारणपती- पत्नीमधील बहुतांश वादाला मोबाइल हेच कारण बनले आहे. अनेक तक्रारींमध्ये पत्नी-पती सतत फोनवर बोलणे, सोशल मीडियावर चॅटिंग करण्यात वेळ घालवतात. त्यातून वाद होत आहेत.

सहा महिन्यांत शेकडो तक्ररीभराेसा सेलकडे मागील सहा महिन्यांत मोबाइलवरून झालेल्या वादाच्या शेकडो तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींवर संबंधितांना एकत्रितपणे बोलावून घेत समुपदेशन करीत पुन्हा संसार जुळविण्याचे काम केल्याची माहिती निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.

सोशल मीडियामुळे संवाद संपलाघरी येताच मोबाइल चेक : पती एका कंपनीत कामाला आहे. तो घरी येताच पत्नी पतीचा मोबाइल घेऊन चेक करते. दिवसभरात कोणाचे कॉल आले. कोणाशी चॅटिंग केली. याविषयी पाहणी केली जाते. त्यातून सतत खटके उडतात.पती कंपनीत जाताच चॅटिंग : एका घटनेत पती नाईटला कंपनीत जाताच पत्नी झोपताना अंगावर पांघरूण घेऊन आतमध्ये व्हाॅट्सॲपवर मध्यरात्रीपर्यंत चॅटिंग करीत राहते. सासऱ्याने अनेकवेळा बघितल्यानंतर विचारणा झाली. तेव्हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला.पतीने काढून घेतला मोबाइल : एका घटनेत पतीने पत्नीचा मोबाइल काढून घेतला. नातेवाइकांसह कोणालाही बोलायचे असेल तर स्वत:च्या मोबाइलवरूनच. त्यामुळे मोबाइल वाद भरोसा सेलपर्यंत पोहोचला.

रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरेघरी आल्यानंतर बेडवर झोपल्यावरही दोघे पती-पत्नी मोबाइललाच चिटकून असतात. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होत आहे. त्यामुळे रात्री मोबाइलपासून दूर राहणेच कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगले आहे.

एकमेकांना वेळ देणे हाच उपायपती-पत्नीने एकमेकांना वेळ देणे हाच वादावरील तोडगा आहे. सोशल मीडिया, फोनवर बोलण्यापासून दूर राहिले पाहिजे. त्याचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होतात. हे टाळण्यासाठी वेळ दिला पाहिजे. विशेषकरून नवविवाहित दाम्पत्यांनी तर याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.- आम्रपाली तायडे, निरीक्षक, भरोसा सेल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम