शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा- बायकोची उडाली झोप; संशयामुळे वैवाहिक आयुष्य पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:22 IST

नवीन जोडप्यांमध्ये मोबाईलमुळेच होतोय सर्वाधिक कलह

- राम शिनगारेऔरंगाबाद : व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियामुळे नवरा- बायकोंमधील संवाद कमी होत आहे. सोशल मीडियावर शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींसोबत चॅटिंग केली जाते. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला आहे. याविषयीच्या तक्रारींचा ओघच भरोसा सेलकडे दररोज येत आहे.

पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारणपती- पत्नीमधील बहुतांश वादाला मोबाइल हेच कारण बनले आहे. अनेक तक्रारींमध्ये पत्नी-पती सतत फोनवर बोलणे, सोशल मीडियावर चॅटिंग करण्यात वेळ घालवतात. त्यातून वाद होत आहेत.

सहा महिन्यांत शेकडो तक्ररीभराेसा सेलकडे मागील सहा महिन्यांत मोबाइलवरून झालेल्या वादाच्या शेकडो तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींवर संबंधितांना एकत्रितपणे बोलावून घेत समुपदेशन करीत पुन्हा संसार जुळविण्याचे काम केल्याची माहिती निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.

सोशल मीडियामुळे संवाद संपलाघरी येताच मोबाइल चेक : पती एका कंपनीत कामाला आहे. तो घरी येताच पत्नी पतीचा मोबाइल घेऊन चेक करते. दिवसभरात कोणाचे कॉल आले. कोणाशी चॅटिंग केली. याविषयी पाहणी केली जाते. त्यातून सतत खटके उडतात.पती कंपनीत जाताच चॅटिंग : एका घटनेत पती नाईटला कंपनीत जाताच पत्नी झोपताना अंगावर पांघरूण घेऊन आतमध्ये व्हाॅट्सॲपवर मध्यरात्रीपर्यंत चॅटिंग करीत राहते. सासऱ्याने अनेकवेळा बघितल्यानंतर विचारणा झाली. तेव्हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला.पतीने काढून घेतला मोबाइल : एका घटनेत पतीने पत्नीचा मोबाइल काढून घेतला. नातेवाइकांसह कोणालाही बोलायचे असेल तर स्वत:च्या मोबाइलवरूनच. त्यामुळे मोबाइल वाद भरोसा सेलपर्यंत पोहोचला.

रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरेघरी आल्यानंतर बेडवर झोपल्यावरही दोघे पती-पत्नी मोबाइललाच चिटकून असतात. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होत आहे. त्यामुळे रात्री मोबाइलपासून दूर राहणेच कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगले आहे.

एकमेकांना वेळ देणे हाच उपायपती-पत्नीने एकमेकांना वेळ देणे हाच वादावरील तोडगा आहे. सोशल मीडिया, फोनवर बोलण्यापासून दूर राहिले पाहिजे. त्याचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होतात. हे टाळण्यासाठी वेळ दिला पाहिजे. विशेषकरून नवविवाहित दाम्पत्यांनी तर याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.- आम्रपाली तायडे, निरीक्षक, भरोसा सेल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम