शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा- बायकोची उडाली झोप; संशयामुळे वैवाहिक आयुष्य पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:22 IST

नवीन जोडप्यांमध्ये मोबाईलमुळेच होतोय सर्वाधिक कलह

- राम शिनगारेऔरंगाबाद : व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियामुळे नवरा- बायकोंमधील संवाद कमी होत आहे. सोशल मीडियावर शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींसोबत चॅटिंग केली जाते. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला आहे. याविषयीच्या तक्रारींचा ओघच भरोसा सेलकडे दररोज येत आहे.

पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारणपती- पत्नीमधील बहुतांश वादाला मोबाइल हेच कारण बनले आहे. अनेक तक्रारींमध्ये पत्नी-पती सतत फोनवर बोलणे, सोशल मीडियावर चॅटिंग करण्यात वेळ घालवतात. त्यातून वाद होत आहेत.

सहा महिन्यांत शेकडो तक्ररीभराेसा सेलकडे मागील सहा महिन्यांत मोबाइलवरून झालेल्या वादाच्या शेकडो तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींवर संबंधितांना एकत्रितपणे बोलावून घेत समुपदेशन करीत पुन्हा संसार जुळविण्याचे काम केल्याची माहिती निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.

सोशल मीडियामुळे संवाद संपलाघरी येताच मोबाइल चेक : पती एका कंपनीत कामाला आहे. तो घरी येताच पत्नी पतीचा मोबाइल घेऊन चेक करते. दिवसभरात कोणाचे कॉल आले. कोणाशी चॅटिंग केली. याविषयी पाहणी केली जाते. त्यातून सतत खटके उडतात.पती कंपनीत जाताच चॅटिंग : एका घटनेत पती नाईटला कंपनीत जाताच पत्नी झोपताना अंगावर पांघरूण घेऊन आतमध्ये व्हाॅट्सॲपवर मध्यरात्रीपर्यंत चॅटिंग करीत राहते. सासऱ्याने अनेकवेळा बघितल्यानंतर विचारणा झाली. तेव्हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला.पतीने काढून घेतला मोबाइल : एका घटनेत पतीने पत्नीचा मोबाइल काढून घेतला. नातेवाइकांसह कोणालाही बोलायचे असेल तर स्वत:च्या मोबाइलवरूनच. त्यामुळे मोबाइल वाद भरोसा सेलपर्यंत पोहोचला.

रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरेघरी आल्यानंतर बेडवर झोपल्यावरही दोघे पती-पत्नी मोबाइललाच चिटकून असतात. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होत आहे. त्यामुळे रात्री मोबाइलपासून दूर राहणेच कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगले आहे.

एकमेकांना वेळ देणे हाच उपायपती-पत्नीने एकमेकांना वेळ देणे हाच वादावरील तोडगा आहे. सोशल मीडिया, फोनवर बोलण्यापासून दूर राहिले पाहिजे. त्याचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होतात. हे टाळण्यासाठी वेळ दिला पाहिजे. विशेषकरून नवविवाहित दाम्पत्यांनी तर याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.- आम्रपाली तायडे, निरीक्षक, भरोसा सेल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम