शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

औरंगाबादेत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे आले ‘पीक’; दोन वर्षांतच ५०० कंपन्या स्थापन

By बापू सोळुंके | Updated: August 12, 2022 13:30 IST

शेतीमालाची मूल्यसाखळी तयार करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ही योजना आणली.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद :शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना आणल्या आहेत. या विषयी माहिती मिळताच जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (फार्म प्रोड्युसर कंपनी) जणू पीकच आले आहे. दोन वर्षात जिल्ह्यात तब्बल ५०० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्याची माहिती आहे. पण यापैकी केवळ २० कंपन्यांनी विविध योजनांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

शेतीमालाची मूल्यसाखळी तयार करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ही योजना आणली. या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी विशेष कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या माध्यमातून घेता येतो. शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यांनतर ज्या कंपनीचे सभासद २५० पेक्षा अधिक आहेत, त्या कंपनीला स्मार्ट अंतर्गत अनुदानावर कृषी औजारे योजनेसह शेतीमालाची प्रतवारी आणि स्वच्छता करण्यासाठी यंत्रणा खरेदी करणे, गुदाम बांधणे, कृषिमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे, यासोबत कृषिमाल प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ६० टक्के अनुदान मिळते. यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांना कीटकनाशक, बियाणे आणि रासायनिक खत विक्रीसाठी कृषी विभागाकडून लायसन्स मिळते. यामुळे या कंपन्या रासायनिक कंपन्यांकडून थेट खत खरेदी करून शेतकऱ्यांना विक्री करून नफा कमावू शकतात. हा नफा सभासद शेतकऱ्यांना ते लाभांश स्वरूपात वाटपही करू शकतात. शिवाय या योजनेला जागतिक बँकेेचे सहकार्य असल्याची माहिती स्मार्टचे नोडल अधिकारी अनिल साळुंके यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात मार्च २०२१पर्यंत २९६ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या होत्या. आता यात आणखी सुमारे २०० कंपन्यांची भर पडली आहे. यातील बहुतेक कंपन्या कागदावरच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१९ कंपन्यांच्या प्रकल्प अहवालांना मंजुरीशेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेनंतर ही कंपनी उद्योग व्यवसाय करण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज करू शकते. कंपनीने सादर केलेल्या प्रकल्प अहवालाचा विचार करून राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून या कंपन्यांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येते आणि नंतर बँकेमार्फत कर्जवाटप केले जाते. जिल्ह्याला ३१ शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योग उभारणीसाठी मंजुरी देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. असे असले तरी आतापर्यंत २० कंपन्यांनी सादर केलेल्या प्रकल्प अहवालांपैकी १९ प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याचे नोडल अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती