शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

औरंगाबादेत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे आले ‘पीक’; दोन वर्षांतच ५०० कंपन्या स्थापन

By बापू सोळुंके | Updated: August 12, 2022 13:30 IST

शेतीमालाची मूल्यसाखळी तयार करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ही योजना आणली.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद :शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना आणल्या आहेत. या विषयी माहिती मिळताच जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (फार्म प्रोड्युसर कंपनी) जणू पीकच आले आहे. दोन वर्षात जिल्ह्यात तब्बल ५०० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्याची माहिती आहे. पण यापैकी केवळ २० कंपन्यांनी विविध योजनांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

शेतीमालाची मूल्यसाखळी तयार करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ही योजना आणली. या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी विशेष कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या माध्यमातून घेता येतो. शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यांनतर ज्या कंपनीचे सभासद २५० पेक्षा अधिक आहेत, त्या कंपनीला स्मार्ट अंतर्गत अनुदानावर कृषी औजारे योजनेसह शेतीमालाची प्रतवारी आणि स्वच्छता करण्यासाठी यंत्रणा खरेदी करणे, गुदाम बांधणे, कृषिमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे, यासोबत कृषिमाल प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ६० टक्के अनुदान मिळते. यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांना कीटकनाशक, बियाणे आणि रासायनिक खत विक्रीसाठी कृषी विभागाकडून लायसन्स मिळते. यामुळे या कंपन्या रासायनिक कंपन्यांकडून थेट खत खरेदी करून शेतकऱ्यांना विक्री करून नफा कमावू शकतात. हा नफा सभासद शेतकऱ्यांना ते लाभांश स्वरूपात वाटपही करू शकतात. शिवाय या योजनेला जागतिक बँकेेचे सहकार्य असल्याची माहिती स्मार्टचे नोडल अधिकारी अनिल साळुंके यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात मार्च २०२१पर्यंत २९६ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या होत्या. आता यात आणखी सुमारे २०० कंपन्यांची भर पडली आहे. यातील बहुतेक कंपन्या कागदावरच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१९ कंपन्यांच्या प्रकल्प अहवालांना मंजुरीशेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेनंतर ही कंपनी उद्योग व्यवसाय करण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज करू शकते. कंपनीने सादर केलेल्या प्रकल्प अहवालाचा विचार करून राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून या कंपन्यांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येते आणि नंतर बँकेमार्फत कर्जवाटप केले जाते. जिल्ह्याला ३१ शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योग उभारणीसाठी मंजुरी देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. असे असले तरी आतापर्यंत २० कंपन्यांनी सादर केलेल्या प्रकल्प अहवालांपैकी १९ प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याचे नोडल अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती