शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

विस्कटलेला संसार घेऊन आम्ही जगायचं कसं...!

By admin | Updated: June 10, 2014 00:33 IST

बंडू खांडेकर, दिंद्रूड गारपिटीतून शेतकरी सावरतो, ना सावरतो तोच वादळ-वाऱ्यात सापडला आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात अनेकांची घरे पडली असून, संसार उघड्यावर आले आहेत.

बंडू खांडेकर, दिंद्रूडगारपिटीतून शेतकरी सावरतो, ना सावरतो तोच वादळ-वाऱ्यात सापडला आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात अनेकांची घरे पडली असून, संसार उघड्यावर आले आहेत. ‘सांगा आम्ही, जगायचं कसं’ अशी आर्त हाक संसार उघड्यावर आलेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.दिंद्रूड परिसरातील मोठीवाडी, हिंगणी, मोहखेड शिवारातील शेतवस्तीवर राहणाऱ्या सुमारे ६५ शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात शेतातील पिकांसह घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पिंगलखोरी, होनमने टेकडी, पळसपट्टी, वाघजई शिवाराकडील शेतकरी आदी भागात या वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात तडाखा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. शेतातील आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने वस्तीवरील गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. ज्या घरामध्ये नागरिक बसले होते त्यांनाही या वादळाचा तडाखा सहन करावा लागला आहे.शेतातील ऊस, उन्हाळी बाजरी, मका, आंबा, मोसंबी, डाळिंब, लिंबोणी या सारखे पिके व फळबागांचेही नुकसान झाल्याने सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील महिन्यातच झालेल्या गारपिटीत शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकरी सावरतो, ना सावरतो तोच पुन्हा वादळाच्या मारपिटीत सापडला आहे. आता यातून सावरणे या शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. गोरखनाथ सोळंके, मीरा चोरमले, विश्वांभर माने आदी नागरिक या वादळी वाऱ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी घरामध्ये बसले असता वाऱ्याने घरावरील पत्रे उडून अंगावर पडल्याने जखमी झाले आहेत. तसेच प्रकाश सोळंके, साळुजी व्हरकटे, बब्रुवान सोळंके, काशीनाथ सोळंके, मुंजा होनमने या शेतकऱ्यांच्याही घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. घटनास्थळी नायब तहसीलदार गेंदले यांनी भेट दिली आहे. मंडळ अधिकारी रोहिदास चव्हाण, तलाठी एकनाथ गोरे बोलताना म्हणाले, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ.