शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

घोड्यास दयामरण : भावनाविवश मुलाने फोनवर विचारले ‘साहेब...आमचा घोडा गेला का?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:52 PM

‘ग्लँडर्स’ची लागण झालेल्या एका घोड्याला दिले भुलीच्या इंजेक्शनसह अन्य एक इंजेक्शन  

ठळक मुद्देघोड्याच्या मालकास भावना अनावर  ग्लँडर्स आजार संसर्गजन्य आजार आहे. विषाणू इतर प्राण्यांबरोबर माणसाच्या शरीरात जाण्याचा धोका

औरंगाबाद : ‘ग्लँडर्स’ आजाराची लागण झालेल्या एका घोड्याला गुरुवारी पडेगाव परिसरात दयामरण देण्यात आले. हा क्षण पाहताना घोड्याचा मालक आणि त्यांच्या तरुण मुलाला भावना अनावर झाल्या. विरहाच्या दु:खाने तो तरुण दयामरणाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच निघून गेला. त्यानंतर त्याने पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना फोन करून ‘साहेब...आमचा घोडा गेला का?’ अशी विचारणा केली. तेव्हा या प्रसंगाने अधिकाऱ्यांचेही मन हळहळले.

कोकणवाडीतील दोन घोड्यांना ग्लँडर्स आजारांची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत त्या दोन्हीही घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार बुधवारी पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या परिसरात दयामरण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह घोड्याचे मालक जनार्दन तांबे,  त्यांचा मुलगा नीलेश तांबे यांची उपस्थिती होती. 

घोड्याला भुलीच्या इंजेक्शनसह अन्य एक इंजेक्शन देण्यात आले. यासाठी जवळपास ८ फूट खड्डा खोदण्यात आला. दयामरणाची वेळ जसजशी जवळ येत होती, तशा तांबे यांच्या भावना अनावरण होत होत्या. ही पूर्ण प्रक्रिया पाहणे त्यांना कठीण जात होते. ज्या घोड्याला प्रेमाने वाढविले, त्याचा मृत्यू डोळ्यादेखत पाहणे टाळून नीलेश तांबे (२२) हे निघून गेले. त्यांनी नंतर फोन करून विचारणा केली.

दुसऱ्या घोड्यालाही देणार दयामरणदुसऱ्या घोड्यालाही दयामरण देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, असे पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी म्हणाले.

‘ग्लँडर्स’ आजारांच्या घोड्यांना इंग्रजांच्या काळात गोळी मारतऔरंगाबादेत पहिल्यांदाच ‘ग्लँडर्स’ या आजाराची लागण झालेल्या दोन घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र,  इंग्रजांच्या काळात हा आजार होणाऱ्या घोड्यांना थेट गोळी मारली जात. विजेचा धक्का, डोंगरावरून ढकलूनही त्यांचे प्राण घेतले जात. कायद्यातील दुरुस्तीमुळे आता घोड्यांना दयामरण दिले जाते. यामुळे या मुक्या प्राण्यांच्या वेदना कमी होण्यासह हा आजार माणसांत पसरण्याचाही धोका टळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान आणि अन्य पर्यटनस्थळांवर घोडेस्वारीसाठी मोठ्या प्रमाणात घोडे पाळले जातात. पावसाळ्यात काही काम नसते. तेव्हा या कालावधीत मोकाट फिरणाऱ्या घोड्यांना हा आजार होतो. पाचगणीत येथे घोड्यांची संख्या मोठी आहे. २००६ साली १५ घोड्यांना या आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले हाते. या घोड्यांनाही दयामरण देण्यात आले होते. औरंगाबादेत पहिल्यांदाच या आजारांचे घोडे आढळून आले. 

कायद्यात झाली सुधारणा ‘ग्लँडर्स फार्सी कायदा १८९९’ नुसार इंग्रजांच्या काळात या प्राण्याला गोळी मारून ठार करण्यात येत, यानंतर पुढे कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. आता इन्फेक्शियस अ‍ॅण्ड काँटेजीएस डिसिस प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड कंट्रोल अ‍ॅक्ट-२००९ आहे. या रोगाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याला दयामरण देण्यासाठी शासनाच्या नियमानुसार समिती गठीत करण्यात येते. समिती प्राण्याचे रक्त तपासते. पशुवैद्यकीय यंत्रणेचा अहवाल घेतला जातो. समितीचा अहवाल आल्यानंतर मग त्याला मरण होताना वेदना होऊ नयेत म्हणून भुलीचे इंजेक्शन देण्यात येते. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. ‘ग्लँडर्स’या रोगाबाबत आजही औषध किंवा लस उपलब्ध नाही.

काय असतो धोका?ग्लँडर्स आजार संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे घोड्यांच्या शरीरावर मोठमोठे फोड येतात. फोड फुटल्यानंतर त्यातून पू आणि रक्त बाहेर पडते. या रक्त आणि पू यामुळेच ग्लँडर्सचा विषाणू इतर प्राण्यांबरोबर माणसाच्या शरीरात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे निदान होताच आजारी घोड्याला इतर घोडे आणि मानवी वस्तीपासून दूर ठेवले जाते. पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी म्हणाले, घोड्यांपासून हा आजार माणसांत पसरण्याची शक्यता असते. माणसाला झाला तर इतर व्यक्तींमध्ये पसरू शकतो. त्यामुळे खबरदारी घेतली जाते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादforestजंगल