शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक ‘बारवे’चे पुनरुज्जीवन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 13:51 IST

शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली.

औरंगाबाद : शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली. या कामाचा शुभारंभ सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर डोरले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बांधकाम व्यावसायिक प्रमोद खैरनार, जलदूतचे अध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित होते.

शहराजवळ असलेले ऐतिहासिक सातारा गाव महापालिकेच्या हद्दीत असतानाही पाण्याची कोणतीही व्यवस्था गावात नाही. यामुळे गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. या गावातच  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी खंडोबा मंदिर व बारवेचे बांधकाम केले होते. या बारवेला बारमाही पाणी असल्याचे वयोवृद्ध नागरिक सांगतात; मात्र या बारवेला झाडाझुडपांनी वेढले आहे.

 या बारवेत कचरा, माती टाकल्यामुळे जवळपास बुजून गेली होती. बारवेचे दगडी बांधकाम अनेक ठिकाणी बुजून गेले होते, तेव्हा जलदूत या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व पाणीतज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सातारा गावातील युवकांना एकत्रित करून बारवेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला. यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याची मोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी जमा केली. यानुसार रविवारी सकाळी ९ वाजता बारवेच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.

या कामाचा शुभारंभ प्राचार्य प्रभाकर डोरले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जलदूतचे किशोर शितोळे यांनी बारवेच्या पुनरुज्जीवन कामाचा तांत्रिक आराखडा गावकऱ्यांना समजावून सांगितला. यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अश्पाक पटेल, अजय चोपडे, लक्ष्मण सोलाटे, जनकल्याण समितीचे बाळकृष्ण खानविलकर, बाळू मिसाळ, प्रशांत बोठे, सोमीनाथ शिराने, दिलीप आरते, विवेक होणावणे, जलदूतचे प्रताप पाटील, विठ्ठल गायकवाड, चेतन पगारे, ज्ञानेश्वर बोरसे, सविता कुलकर्णी, सुधीर फुलवाडकर, रामेश्वर मोहिते, लक्ष्मण सोलाटे  आदी उपस्थित होते.

बारव ऐतिहासिक ठेवासातारा गावातील ऐतिहासिक बारवेच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. बारवेचे पुनरुज्जीवन झाल्यास सातारावासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. या कामासाठी इतिहासप्रेमी, शहरातील नागरिकांनी पुढे यावे. सदर बारव आपला ऐतिहासिक ठेवा आहे. या कामातून तो जपण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.- किशोर शितोळे, जलदूत सामाजिक संस्था

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरwater shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका