शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

By admin | Updated: September 19, 2014 01:00 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवड प्रक्रिया विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असल्याने कुठल्याही सदस्याची


उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवड प्रक्रिया विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असल्याने कुठल्याही सदस्याची नाराजी ओढावून घेणे श्रेष्ठींना परवडणारे नाही. असे असतानाच विद्यमान पदाधिकाऱ्यांना ४० ते ४१ दिवसांचा कालावधी कमी मिळाल्याचे सांगत काँग्रेसचे कृषी सभापती पंडित जोकार यांनी १६ सप्टेंबर रोजी हायकोर्टामध्ये निवडीविरूद्ध हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाने पक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदस्यांना नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. राजकीय हालचालींना वेगही आला आहे. काँग्रेसने सदस्यांची एकत्रिक बैठक घेवून त्यांचे मत जाणून घेतले आहे. मात्र, ही निवडप्रक्रिया विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असल्याने पक्षश्रेष्ठींची कोंडी झाली आहे. अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटले असल्याने इच्छुकांची संख्याही मोठी आहे. कोण्या एका सदस्याला अध्यक्षपदी विराजमान केले तर दुसऱ्या सदस्यांची नाराजी ओढावणार हे निश्चित असल्याने ही निवड प्रक्रिया विधानसभेनंतर व्हावी, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यानुषंगाने कोर्टातून निवडीला स्थगिती मिळविता, येते का याबाबत निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून विचार विनिमय सुरू होता. असे असतानाच १६ सप्टेंबर रोजी काँग्रेसला कोर्टामध्ये धाव घेण्यायोग्य मुद्दा गवसला. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसून आणखी ४० ते ४१ दिवस बाकी असल्याचे सांगत त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. याच मुद्याला धरून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विश्वासातील म्हणून ओळख असलेले कृषी सभापती पंडित जोकार यांनी १६ सप्टेंबर रोजी अ‍ॅड. धनंजय ठोके यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी सुनावणी होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे उद्याच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
(प्रतिनिधी)