शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

बड्या थकीत कर्जाचे सामान्यांवर ओझे; तोटा भरण्यासाठी बँकांची ग्राहकांच्या खिशाला खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:09 IST

बचत खात्यावरील व्याजदर कमी करून २५ हजार कोटी रुपये सर्वसामान्य खातेदारांच्या खिशातून काढून घेण्यात आले

ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांचे १0 रोजी आंदोलन बँकांनी बड्या कर्जदारांचे ६ लाख ७६९ कोटी रुपयांचे थकीत कर्ज माफ केले

औरंगाबाद : मागील पाच वर्षांत बँकांनी बड्या कर्जदारांचे ६ लाख ७६९ कोटी रुपयांचे थकीत कर्ज माफ केले आहे. मात्र,  दुसरीकडे खात्यात किमान रक्कम नसलेल्या खातेदारांकडून ६१५५.१० कोटी, तर बचत खात्यावरील व्याजदर कमी करून २५ हजार कोटी रुपये सर्वसामान्य खातेदारांच्या खिशातून काढून घेण्यात आले आहे. बड्या थकीत कर्जाचे ओझे बँका सामान्य ग्राहकांवर लादत असल्याचा आरोप, देवीदास तुळजापूरकर यांनी केला आहे. 

तुळजापूरकर यांनी सांगितले की, वित्त खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी २५ नोव्हेंबर रोजी लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, बँकांनी गेल्या पाच वर्षांत ६००७६९ कोटी रुपयांचे थकीत कर्ज राईट आॅफ म्हणजे माफ केले आहेत. त्यातील एकाच स्टेट बँकेने गेल्या पाच वर्षांत २६७२६३ कोटी रुपये म्हणजे ४४.४८ टक्के थकीत कर्ज राईट आॅफ म्हणजे जणू माफ केले आहेत. २०१८-२०१९ या एका वर्षात ३५ टक्के थकीत कर्ज माफ केले आहेत. ६ लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्जापैकी शेती क्षेत्राला दिलेली रक्कम ४३ हजार ५९ कोटी रुपये म्हणजे अवघी ७.३६ टक्के थकीत कर्ज माफ केले आहेत, तर सेवा तसेच व्यापारी क्षेत्रातील १ लाख ६६ हजार कोटी रुपये माफ केले आहेत, तर उद्योगक्षेत्राला दिलेले सुमारे ४ लाख कोटी रुपयांचे थकीत कर्जही माफ केले आहे. 

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार ५०० कोटी रुपयांच्या वरील ८८ थकीत कर्जदारांकडील १ लाख ७ हजार कोटी रुपये, तर १०० कोटी रुपयांवरील ९८० थकीत  कर्जदारांकडील २ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे थकीत कर्ज माफ केले आहेत. त्यातील एकट्या स्टेट बँकेने ५०० कोटी रुपयांवरील ३३ थकीत कर्जदारांकडील ३७ हजार ५०० कोटी रुपये, तर १०० कोटी रुपयांवरील २२० थकीत कर्जदारांकडील ३७ हजार ७०० रुपये माफ केले आहे. तुळजापूरकर पुढे म्हणाले की, बड्या उद्योगांची मोठी कर्जे माफ केल्यामुळे बँका तोट्यात आल्या आहेत. सरकारने गेल्या सात वर्षांत अर्थसंकल्पात तरतूद करून ३ लाख ३८ कोटी रुपये भांडवल उपलब्ध करून दिले आहे. म्हणजेच सामान्य माणसाकडून गोळा केलेल्या करातून हे भांडवल उपलब्ध करून दिले आहे, तर दुसरीकडे हा तोटा भरून काढण्यासाठी ग्राहकांवर आकारण्यात येणारे शुल्क वारेमाप वाढवण्यात आले आहे. 

गेल्या तीन वर्षांत बँकांना किमान रक्कम खात्यात ठेवता आली नाही म्हणून आपल्या खातेदारांकडून ६१५५.१० कोटी रुपये वसूल केले आहेत. याशिवाय याच काळात बचत खात्यांवरील व्याजदर सुरुवातीला ४ टक्क्यांवरून ३.५० टक्के आणि आता ०.२५ टक्क्यांनी कमी केला आहे. म्हणजे आता बचत खात्यावर ३.२५ टक्के व्याज देण्यात येईल याचाच अर्थ २५ हजार कोटी रुपये सामान्य माणसाच्या खिशातून काढून घेण्यात आले आहेत, अशा पद्धतीने बड्या थकीत कर्जाचे ओझे बँका सामान्य माणसावर लादत आहेत. या पार्श्वभूमीवर बँकिंग उद्योगातील एआयबीओए, एआयबीओसी, बेफी, इन्बोक आणि इन्बेफ या सहा संघटनांचे प्रतिनिधी १० डिसेंबर रोजी दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती तुळजापूरकर यांनी दिली. 

संघटनेच्या मागण्याबँकांचे विलीनीकरण, खाजगीकरण करू नये. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरकारने कठोर पावले उचलावीत. 

टॅग्स :bankबँकCentral Governmentकेंद्र सरकारAurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारी