शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
8
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
9
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
10
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
11
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
12
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
13
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
14
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
15
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
16
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
20
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाला रिक्तपदांचा आजार

By admin | Updated: July 9, 2014 00:08 IST

हिंगोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तब्बल ९ प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नियमित कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या विभागावरच उपचाराची गरज निर्माण झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तब्बल ९ प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नियमित कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या विभागावरच उपचाराची गरज निर्माण झाली आहे.
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या आरोग्य विभागाकडे शासनाने गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्याशी संबंधित विविध विभागातील पदे सातत्याने रिक्त राहत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील अतिरिक्त आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, साथरोग वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहाय्यक संचालक कृष्टरोग या तब्बल ९ अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे. ही रिक्त पदे भरण्याची मागणी वेळोवेळी शासनाकडे करण्यात आली; परंतु शासनस्तरावरून त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या पदाचा पदभार अन्य अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळत आहेत. परिणामी या पदाला व या कार्यालयांतर्गत येणाऱ्या कामांना न्याय देता येईनासा झाला आहे. जिल्हा परिषदेतील अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांचे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. तर साथरोग अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. हे पद भरले गेले नसल्याने निर्माण होणाऱ्या साथरोगांवर उपाययोजना करण्यासाठी तात्काळ निर्णय होत नाही. परिणामी अनेक वेळा जनतेच्या जीवाला धोका निर्माण होतो; परंतु शासन मात्र याकडे गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
आरोग्य राज्यमंत्र्यांकडून अपेक्षा
राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेऊन रिक्त पदे त्वरीत भरण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यमंत्री फौजिया खान जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या; परंतु त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घातले नव्हते.
आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या तब्बल ९ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने जनतेला समाधानकारक सेवा मिळेना.
रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज.