शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अर्धा पावसाळा संपलाय; मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणी

By बापू सोळुंके | Updated: July 25, 2024 12:50 IST

पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरण क्षेत्रासाठी अपुरा; पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पांना कमी पाणी

छत्रपती संभाजीनगर : अर्धा पावसाळा संपलाय; मात्र, मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंतेची परिस्थिती आहे. बहुतेक मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे किंवा ही धरणे कोरडी आहेत. मोठ्या प्रकल्पांत गतवर्षी आजच्या तारखेला ३५.१७ टक्के पाणीसाठा होता.

मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत २०२२ सालातील पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणीसंचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत २०२२ सालातील पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणीसंचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत.तीन प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागाकडेही मुसळधार पावसाने पाठ फिरवल्याने जायकवाडी प्रकल्पात आजच्या दिवशी केवळ ४.३ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी आजच्या दिवशी प्रकल्पात २७.६५ टक्के पाणीसाठा होता. सीना कोळेगाव, मांजरा आणि माजलगाव या तीन मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पावर जवळची शहरे आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. तेथे धरणांतील मृत साठ्यातून पाणीपुरवठा होत आहे.

धरण आजचा जलसाठा आणि गतवर्षीची स्थितीजायकवाडी - ४.३ टक्के ---- २७.६५ टक्केनिम्न दुधना - ६.४० टक्के ------- २७.३८ टक्केयेलदरी - ३०.८ टक्के ------ ५७.८८ टक्केसिद्धेश्वर - ५.६६ टक्के ------ ९.८७ टक्केपेनगंगा - ४० टक्के --------- ४८.८० टक्केमानार - २७.३६ टक्के -------- ३५.६ टक्केनिम्न तेरणा - २५ टक्के ------- २७.६० टक्केविष्णुपुरी - ७० टक्के ----- ५३.६१ टक्केमाजलगाव - ०० ------ १६.२८ टक्केमांजरा -- ०० ----- २३.२४ टक्केसीना कोळेगाव - ०० ---- उणे १४ टक्केमराठवाड्यात आजवर ५२ टक्के पाऊस

पाणलोट क्षेत्राला दमदार पावसाची अपेक्षामराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५२.२ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी ६७९.५ मिमी पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत आजवर ३५४.७ मिमी पाऊस विभागात झाला आहे. परंतु, प्रत्यक्षात पाणलोट क्षेत्रामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे ७४९ लहान, ११ मोठे व मध्यम अशा ७५ प्रकल्पांमध्ये १६.२४ टक्के जलसाठा आहे. विभागात ५२.२ टक्के पाऊस सध्या झाल्याचे आकडे सांगत आहेत; परंतु, वस्तुस्थिती पाहिली तर हा पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरण क्षेत्रासाठी अपुरा आहे. गोदावरी नदीसह ११ नद्यांचे पाणलोट क्षेत्र कमी पावसामुळे तहानले आहे. दमदार पाऊस पाणलोट क्षेत्रात न झाल्यामुळे प्रकल्पांना कमी पाणी आहे.

जिल्हानिहाय पाऊसछत्रपती संभाजीनगर - ५६.९ टक्केजालना - ५५.३ टक्केबीड - ६२.३ टक्केलातूर - ५६.४ टक्केधाराशिव - ६१.१ टक्केनांदेड - ४४.४ टक्केपरभणी - ४५.८ टक्केहिंगोली - ४३.४ टक्केएकूण : ५२.२ टक्के

- वार्षिक सरासरी पाऊस : ६७९.५ मिमी- जूनपासून आजवरचा पाऊस : ३५४.७ मिमी- जुलै महिन्यात पडलेला पाऊस १७१.४ मिमी- पेरण्या : ९७ टक्के

पाणलोट क्षेत्रात आजवर झालेला पाऊसप्रकल्प ................. नदी क्षेत्रातील पाऊसजायकवाडी गोदावरी .... २१८ मिमीनिम्न दुधना ........ ४२३ मिमीयेलदरी पूर्णा......... ४९३ मिमीसिद्धेश्वर पूर्णा .......... ३१७ मिमीमाजलगाव सिंदफणा .... २६५ मिमीमांजरा ........... ४७४ मिमीपेनगंगा .......... ३७९ मिमीमानार ............ ४४६ मिमीनिम्न तेरणा ............ ४२३ मिमीविष्णुपुरी गोदावरी ........ ३८६ मिमीसीना कोळेगाव ....... २७४ मिमी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDamधरणRainपाऊसJayakwadi Damजायकवाडी धरण