शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बंधारा दुरुस्तीचे ३.५९ कोटींचे सरकारी अंदाजपत्रक; खाजगीत झाले १३ लाखांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:53 IST

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर निशाणा साधला.

ठळक मुद्देपावसामुळे बंधारा वाहून गेला. खर्च द्यायचा कसा, यात बंधाऱ्याची दुरुस्ती फसली होती.

औरंगाबाद : २०१५ च्या सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने बोरगाव येथील बंधारा दोन्ही बाजूंनी फुटला होता. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सरकारी अंदाजपत्रक ३ कोटी ५९ लाखांचे पाठविण्यात आले होते. पुढील पावसाळ्यापूर्वी काम करण्यासाठी खूप प्रयत्न केला; परंतु खर्चाच्या मुद्यावरून काम अडकले. शेवटी एका खासगी कंत्राटदाराकडून हे काम करून घेतले. त्यासाठी कंत्राटदाराने केवळ १३ लाख ५० हजार रुपयांचे बिल दिले, असे सांगत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२५) पाणी परिषदेत शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर निशाणा साधला.

एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात घेतलेल्या दोनदिवसीय राज्यस्तरीय पाणी परिषदेचा रविवारी समारोप झाला. याप्रसंगी हरिभाऊ बागडे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंदर सिंगल, माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, मिलिंद पाटील, मधुकरअण्णा वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले, पाणी परिषदेत अधिकारी आहेत. लोकसहभागातून काम केल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. पावसामुळे बंधारा वाहून गेला. त्यावेळी जिल्हा परिषदेला अधिकाऱ्यांनी २० कोटींचा प्रस्ताव सादर केलेला होता; परंतु आधीचेच देणे आहे, असे मंत्रालयातून सांगण्यात आले. १६४ कोटी रुपयांचा हा भार होता. मंत्र्याशी बोललो, मात्र काही उपयोग झाला नाही. खर्च द्यायचा कसा, यात बंधाऱ्याची दुरुस्ती फसली होती. पावसाळ्यापूर्वी एका कंत्राटदाराने १३.५० लाखांत ते काम केले. त्यासाठी ३ कोटी ५९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक पाठविले होते, असे हरिभाऊ बागडे म्हणाले.

पाणी अडवले, तर दु:ख नकोवरच्या भागात पाणी अडविल्याने धरणे कोरडी झाली, असे म्हटले जाते; परंतु धरणाचे पाणी हे खालीच येत असते. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. गावात, शिवारात पडणाऱ्या पाण्यावर तिथल्याच लोकांचा हक्क असला पाहिजे. त्यामुळे कोणी पाणी अडवले, तर दु:ख मानू नये, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.

जलसंवर्धनाची चळवळ तरुणांनी पुढे न्यावी रविंदर सिंगल म्हणाले, जलसंवर्धनाची चळवळ ही पुढे घेऊन जायची आहे. त्यासाठी तरुणांकडून खूप अपेक्षा आहे. मी पोलीस अधिकारी असलो तरी एक नागरिक आहे. पुढच्या पिढीसाठी काम करायचे आहे. सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी काम केले जाईल. त्यासाठी सर्वसामान्यांची साथ मिळेल. विजयअण्णा बोराडे म्हणाले, पाण्याचे महिलांना अधिक गांभीर्य असते. त्यामुळे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त महिलांचा सहभाग झाला पाहिजे.

खाम नदीचा निर्णय जिल्हाधिकारी घेतीलरविंदर सिंगल म्हणाले, परिषदेत एकाच वेळी अनेक तज्ज्ञ एकत्र आले. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून समोर आलेल्या मुद्यांचे पाणी परिषदेची समिती डॉक्युमेंटशन करणार आहे. या मुद्यांसंदर्भातील अ‍ॅक्शन प्लॅन आगामी आठ ते दहा दिवसांत शासनाला सादर केला जाईल. खाम नदीच्या पुनरुज्जीवनासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी घेतील.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. शैलेंद्र गायकवाड, भास्कर पेरे, पंडित वासरे, हेमंत बेलसरे, नाम फाऊंडेशनच्या शुभा महाजन, रेनबो फाऊंडेशनचे प्रशांत परदेशी, उपविभागीय अभियंता अरुण घाटे, शीतल गायकवाड यांचे व्याख्यान झाले. गायक राजेश सरकटे, गायिका संगीता भावसार यांनी पाण्याविषयी जनजागृती करणाऱ्या गीतांचे सादरीकरण केले. प्रा. प्रशांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेंद्र गायकवाड, राहुल रायकर, श्याम दंडे, किरण बिडवे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेState Governmentराज्य सरकारWaterपाणीAurangabadऔरंगाबाद