शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर ! 'मराठवाड्याची लाईफलाईन' जायकवाडी धरणात ५१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:10 IST

मराठवाड्याची लाईफ लाईन असलेला जायकवाडी प्रकल्प यंदा स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पाण्याने भरत असल्याने मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देदोन महिन्यात जलाशयाची पाणी पातळी चार फुटाने वाढली आहे जायकवाडी धरणात १ जून रोजी ३६.५५% जलसाठा होता.

- संजय जाधव

पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा शनिवारी सकाळी @ ५१% झाला असून जायकवाडीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणात २२०२६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. विशेष म्हणजे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्यावर नेहमी अवलंबून असलेले जायकवाडी धरण या भागातून पाण्याचा एक थेंब आलेला नसताना यंदा ५१% भरले आहे. दुसरीकडे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहात मात्र अपेक्षेप्रमाणे अद्याप जलसाठा झालेला नाही. मराठवाड्याची लाईफ लाईन असलेला जायकवाडी प्रकल्प यंदा स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पाण्याने भरत असल्याने मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

जायकवाडी धरणात १ जून रोजी ३६.५५% जलसाठा होता. दरम्यान जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, येवला, राहुरी आदी भागात दोन महिण्यात पावसाने सातत्य राखत जोरदार हजेरी लावली. या भागातील ( मुक्त पाणलोट क्षेत्र) पावसाचे पाणी विना अडथळा सरळ जायकवाडी धरणात येऊन मिळते. १ जून पासून धरणाच्या जलसाठ्यात मुक्त पाणलोट क्षेत्रातून  ४२३ दलघमी ( १५ टिएमसी) पाणी दाखल झाले असून जलसाठ्यात १४.५०%  वाढ झाली आहे. दोन महिन्यात जलाशयाची पाणी पातळी चार फुटाने वाढली आहे असे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.जायकवाडी धरणात शनिवारी सायंकाळी १८४५.८५८ दलघमी (६५.१७ टिएमसी) एकूण जलसाठा झाला होता. या पैकी ११०७.७५२ दलघमी (३९.११ टिएमसी) उपयुक्त जलसाठा आहे. धरणात ५१% जलसाठा झाला असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदिप राठोड यांनी सांगितले. जायकवाडी धरणावर गत वर्षी आजच्या तारखे पर्यंत १२१ मि मी पाऊस झाला होता तर यंदा ५२९ मि मी पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षी आजच्या तारखेस जायकवाडीचा जलसाठा उणे ( - २.९६%) ईतका होता असे  धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.जायकवाडी धरणात अपेक्षित जलसाठा झाल्याने धरणातून पिण्यासाठी व सिंचनासाठी नियोजना प्रमाणे पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  मोठा पावसाळा अद्याप बाकी असून ऑक्टोबर पर्यंत धरणात आवक सुरू असते त्यामुळे यंदा धरण १००% भरणारच अशी अपेक्षा अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील धरणात ५२.६४% जलसाठा.....मांजरा व सिना कोळेगाव वगळता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मराठवाड्यातील धरणात ५२.६४% उपयुक्त जलसाठा झाला  असल्याची माहिती अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे. सिना कोळेगाव ( उणे - ९६%) व मांजरा ( उणे ४.४२%) असा जलसाठा आहे. ही दोन धरणे वगळली तर निम्न दूधना ३३.९९%, येलदरी ७८.४५%, सिद्धेश्वर ६१.७१%, माजलगाव ५८.५३%, पैनगंगा ५१.७६%, मानार ६५.८३%, निम्न तेरणा ०.५८% व विष्णूपुरी धरणात ८४.६१%, जलसाठा झाला आहे. या सर्व धरणातील एकूण उपयुक्त जलसाठा ५१५२.७९ दलघमी असून आज रोजी या धरणात २७१२.८१ दलघमी जलसाठा झाला आहे.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा.....गेल्या काही वर्षात नाशिक व अहमद नगर जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेल्या पाण्यावरच जायकवाडी अवलंबून होते. परंतु यंदा जायकवाडी धरणात ५१% जलसाठा झालेला असताना दोन्ही जिल्हातील धरणात अपेक्षित जलसाठा होऊ शकला नाही. जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणाचा जलसाठा पुढील प्रमाणे.करंजवन १८.८२%, वाघाड ११.९५%, ओझरखेड ४०.५६%, पालखेड ३२.१७%, गंगापूर ५५.२२%, गौतमी २१.०७%, कश्यपी २४.९०%, कडवा २२.४५%, दारणा ६९.४३%, मुकणे २८.३७%,  भंडारदरा ४८.५०%, निळवंडे ४९.२४%,  मुळा ३३.३७% असा जलसाठा आजरोजी आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊसWaterपाणी