शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला मारहाण

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

औरंगाबाद : आजही समाजात आंतरजातीय प्रेमविवाह करण्यास खुल्या मनाने मान्यता दिली जात नाही. त्यामुळे अनेक जोडप्यांना पळून जाऊन गुपचूप लग्न करावे लागते.

औरंगाबाद : आजही समाजात आंतरजातीय प्रेमविवाह करण्यास खुल्या मनाने मान्यता दिली जात नाही. त्यामुळे अनेक जोडप्यांना पळून जाऊन गुपचूप लग्न करावे लागते. आंतरजातीय प्रेमविवाहावर आधारित सैराट चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम करीत आहे. या चित्रपटात तरुणीचे नातेवाईक शेवटी त्या युगुलाचा खात्मा करताना दाखविण्यात आले आहे. या चित्रपटातील दृश्याप्रमाणेच शहरातील एका प्रेमविवाह केलेल्या तरुणीला तिच्या माहेरकडील मंडळींनी बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना २६ मे रोजी दुपारी गारखेडा परिसरातील विजयनगर येथे घडली.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अंजली (नाव बदलले आहे) ही आई-वडिलांसह तर समीर पाटील (नाव बदलले) मावशीच्या घरी एका कॉलनीत राहत असत. दोन वर्षांपासून त्यांचे प्रेम होते. त्यामुळे त्यांनी परिवाराकडे आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, मुलीच्या नातेवाईकांकडून त्यांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी या लग्नास नकार दिला.
शेवटी महिनाभरापूर्वी अंजली आणि समीर यांनी प्रेमविवाह केला. नवविवाहित दाम्पत्य विजयनगर येथे राहू लागले. याबाबतची माहिती तिच्या माहेरच्या मंडळींना मिळाली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अंजली घरी एकटी असताना तिच्या माहेरचे चार जण तिच्या घरी गेले. यावेळी त्यांनी तिला तू प्रेमविवाह का केला असे विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली.
याप्रसंगी झालेल्या आवाजामुळे शेजारी मदतीसाठी धावत आल्याने तिची सुटका झाली. या घटनेनंतर तिने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.