शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटींतून मुलींचे वसतिगृह

By admin | Updated: April 27, 2015 01:00 IST

लातूर : १ हजार प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहाच्या वास्तूनंतर आता सामाजिक न्याय भवनाच्या दोन एकर जागेत खास मुलींसाठी १२ कोटी ७४ लाखांतून वसतिगृहाच्या दोन भव्य वास्तू साकारत आहेत

लातूर : १ हजार प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहाच्या वास्तूनंतर आता सामाजिक न्याय भवनाच्या दोन एकर जागेत खास मुलींसाठी १२ कोटी ७४ लाखांतून वसतिगृहाच्या दोन भव्य वास्तू साकारत आहेत. जिल्ह्यातील २२ पैकी १५ वसतिगृहांना स्वत:च्या इमारती असून, दोन वसतिगृहांचे काम सुरू आहे. तर दोन वसतिगृहांसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ तीन वसतिगृहांना स्वत:च्या इमारतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.सामाजिक न्याय विभागाची जिल्ह्यात २२ वसतिगृहे आहेत. लातूर शहरात १ हजार क्षमतेच्या वास्तूमध्ये मुला-मुलींचे प्रत्येकी दोन वसतिगृह आहेत. शहरातील अन्य दोन मुलींच्या वसतिगृहासाठी स्वत:ची इमारत नव्हती. भाड्याने घेतलेल्या इमारतीत मुलींच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या साडेसहा एकर जागेतील दोन एकर जागेमध्ये मुलींच्या दोन वसतिगृहांसाठी दोन वास्तू तयार होत आहेत. प्रत्येकी ६ कोटी ४० लाख रुपये खर्च करून दोन वास्तू तयार केल्या जात आहेत. तळमजल्यासह दोन मजल्यांची सामाजिक न्याय भवनाच्या वास्तूला शोभेल अशाच याही वास्तू डालडा फॅक्टरीच्या जागेत साकारत आहेत. शासनाने समाजकल्याण विभागाला हा निधी वितरीत केला असून, सामाजिक न्याय विभागाकडून वास्तूचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. लातूर तालुक्यातील ६, औसा २, निलंगा २, उदगीर २, अहमदपूर २, रेणापूर १ अशा १५ वसतिगृहांच्या इमारती सामाजिक न्याय भवनाच्या जागेत आहेत. आता लातूर शहरात वसतिगृहासाठी दोन वास्तू तयार होत आहेत. राज्य शासनाकडून प्रती वास्तूसाठी ६ कोटी ४० लाख रुपये असे एकूण १२ कोटी ७४ लाखांचा निधी मिळाला आहे. या वास्तूमध्ये मुलींच्या निवासाची सोय केली जाणार आहे. तर अहमदपूर व देवणी येथे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता भाड्याच्या जागेत वसतिगृह राहणार नाहीत. स्वत:च्या इमारतीत सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह असतील. केवळ तीन वसतिगृहांसाठी भाड्याने इमारत असेल, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संजय दाणे यांनी दिली. शहरात मुलींना राहण्याची सोय नसल्यामुळे गळती होती. समाजकल्याणने वसतिगृहाची सोय केल्याने गळती थांबेल. (प्रतिनिधी)