शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

सेतू सुविधा केंद्राचे कामकाज कोलमडले !

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

परंडा : सर्व्हर बंद पडल्यान मागील चार दिवसांपासून येथील सेतू सुविधा केंद्राचे संपूर्ण कामकाज कोलमडले आहे.

परंडा : सर्व्हर बंद पडल्यान मागील चार दिवसांपासून येथील सेतू सुविधा केंद्राचे संपूर्ण कामकाज कोलमडले आहे. तर दुसरीकडे सेतु केंद्रावर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालकांची एकच गर्दी उडाली आहे. केवळ अर्ज देण्यासाठी नागरिकांना एकेक तास रांगेत उभे रहावे लागत आहे. मात्र, सर्वसामान्यांची ही फरफट महसूल विभागाचे अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत.
दहावी व बारावी परीक्षेचे निकाल नुकतेच लागले आहेत. पुढील शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहेत. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयातून काढावी लागतात. यासाठी सेतू सुविधा केंद्रामध्ये अर्ज करावा लागतो. परंतु, या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यासाठी एकाच टेबलाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्यांना केवळ अर्ज देण्यासाठी एकेक दिवस खर्ची घालावा लागत आहे. दरम्यान, सातबारा, प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी एक व जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी एक अशा दोन टेबलांची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. एखाद्या प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्यानंतर १५ दिवसांत संबंधित प्रमाणपत्र मिळत नाही. याचा फटकाही विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे. कोणत्या प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे जोडावीत, याचा फलकही सेतू केंद्राबाहेर लावण्यात आलेला नाही. तर अर्ज स्वीकारताना आवश्यक यादीपेक्षाही अधिक कागदपत्रे मागितली जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान, उपविभागीय पाठविल्या जात असलेल्या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणत त्रुटी निघत असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाचा प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अर्जाचे नमुने तहसील परिसरातच चढ्या दराने विकून नागरिकांना लुबाडले जात आहे. नागरिकांच्या या हालअपेष्टांकडे लक्ष द्यायला महसूल अधिकाऱ्यांना सवड मिळणा कधी? असा प्रश्नही या निमित्ताने विद्यार्थी, पालकांतून उपस्थित केला जावू लागला आहे. (वार्ताहर)
डेडलाईन केवळ नावालाच...
सेतू केंद्रात अर्ज दाखल केल्यानंतर किमान १५ दिवसांत कोणतेही प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. मात्र, येथील सेतू केंद्रातून पावतीवरील तारीख उलटून गेल्यानतंरही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे वेळ आणि पैसा नाहक र्खच होतो आहे. सध्या शेतकरी व विद्यार्थ्यांची या केंद्रावर जादा गर्दी दिसते. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपत एक-दोन महिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ संतप्त
चार दिवसांपासून सर्व्हर जॅम झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच अन्य ग्रामस्थही त्रस्त झाले आहेत. सोमवारी तहसीलदार उपस्थित नसल्याने थेट नायब तहसीलदार पांडळे यांचे दालन गाठले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर तक्रारींचा पाऊस पाडला. कार्यालयातील मंडळी पाठीमागच्या दरवाजातून ‘खास’ मंडळीचे अर्ज स्वीकारतात, अशी तक्रारही केली. याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
परंडा शहरात सहा आणि ग्रामीण भागात सहा असे एकूण १२ महा-ई-सेवा केंद्र सुरू आहेत. या केंद्राद्वारेही कागदपत्रांसाठी अर्ज करता येताता. महा-ई-सेवा केंद्रधारक अगाऊ रक्कमेची आकारणी करीत असल्यास त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नायब तहसीलदार एस.एस. पाडळे यांनी सांगितले.