शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील साडेपाच हजार कि.मी.रस्ते गेले वाहून

By | Updated: November 28, 2020 04:09 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे साडेपाच हजार कि.मी.रस्ते पावसाळ्यात झालेल्या अविृष्टीमुळे वाहून गेले आहेत. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे शेतकऱ्यांना माल बाजारपेठेत ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे साडेपाच हजार कि.मी.रस्ते पावसाळ्यात झालेल्या अविृष्टीमुळे वाहून गेले आहेत. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे शेतकऱ्यांना माल बाजारपेठेत आणण्यास अडचणी येत असून, रस्ते विकासासाठी शासनाने १० हजार कोटींच्या पॅकेजमधून काही रक्कम रस्ते बांधणीसाठी देण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने मराठवाडा विभागात ५५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे. साठवलेला शेतमाल, जनावरांचे गोठे, बी-बियाणे शेतात असलेल्या घरातील जीवनावश्यक वस्तू महापुरात वाहून गेल्या. खरिपातील उभे पीक अतिवृष्टीने आडवे झाले. शेतकऱ्यांच्या या नुकसानीसोबतच दळणवळणासाठी असलेले रस्तेही वाहून गेले. त्या रस्त्यांची डागडुजी करणे, काही नवीन पक्के रस्ते तयार केल्यास शेतमालाला मार्केटपर्यंत नेणे सोपे होईल. भाजीपाला, फळे, दूध हा माल वेळेत बाजारपेठेपर्यंत जाणे आवश्यक असते. त्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच शासनाने अतिवृष्टीसाठी जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून ५ हजार कोटी रुपये रस्ते विकासासाठी दिले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यात याबाबत शासननिर्णय जाहीर होण्याची शक्यता असून विभागात सुमारे ५५० कोटी रुपयांचा खर्च रस्ते बांधणी व दुरुस्ती, पूल दुरुस्तीसाठी लागणार आहेत. अनुदान मागणीचा अहवाल शासनाकडे बांधकाम विभागाने पाठविला आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डी. डी. उर्किर्डे यांनी सांगितले, विभागातील साडेपाच ते सहा हजार कि.मी.रस्त्यांवर अतिवृष्टीमुळे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. पुलांचेही नुकसान झालेले नाही. अद्याप शासनाकडून अनुदान आलेले नाही. परंतु, आवश्यक जी कामे आहेत, ती सुरू करण्यात आलेली आहेत.

महसूल उपायुक्तांची माहिती अशी

महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले, सुधारित प्रस्तावानुसार सुमारे २६०० कोटींची मदत माणसे, जनावरे आणि पिकांचे नुकसान याप्रमाणे मिळावी, असा तो प्रस्ताव आहे. त्यामध्ये रस्ते विकासासाठी देखील शासन विचार करीत असेल. परंतु, ती मागणी आमच्याकडून गेलेली नाही. मदतीचा पहिला टप्पा आलेला आहे, दुसरा टप्पा येण्याची प्रतीक्षा आहे.