शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीच मिळेना

By admin | Updated: August 4, 2014 00:47 IST

बळीराम कच्छवे, दैठणा परभणी तालुक्यातील दैठणा गावामध्ये अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न रखडला आहे़ आजही येथील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी उरकावा लागत आहे़

बळीराम कच्छवे, दैठणापरभणी तालुक्यातील दैठणा गावामध्ये अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न रखडला आहे़ आजही येथील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी उरकावा लागत आहे़ त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ दैठणा या गावाची लोकसंख्या अंदाजे १० ते १५ हजार एवढी आहे़ या गावामध्ये सर्वाधिक राजपूत समाजाची लोकसंख्या आहे़ तसेच सर्वजाती-धर्माचे लोक येथे राहतात़ एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावासाठी स्मशानभूमीच नाही़ त्यामुळे गावालगत असलेल्या इंद्रायणी नदीच्या काठावर मोकळ्या जागेत अंत्यविधी उरकून घ्यावा लागतो़ या ठिकाणी ग्रामस्थ व नातेवाईकांना उभे राहण्यासाठी जागा नाही़ त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो़ गावासाठी स्मशानभूमीसाठी जागा द्यावी यासाठी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला़ परंतु, शासन दरबारी हा प्रस्ताव वर्षानुवर्षे रखडत पडला आहे़ शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे स्मशानभूमीचा प्रश्न बासनात बसला आहे़ तसेच स्मशानभूमी नसल्यामुळे शेडही नाही़ शासन दरवर्षी यावर कोट्यवधी खर्च करीत आहे़ मात्र हा निधी कुठे जातो हा प्रश्नच आहे़ निधी जातो कुठेजिल्ह्यासाठी दरवर्षी स्मशानभूमी व शेड बांधण्यासाठी कोट्यवधींचा निधी येतो़ हा निधी कागदोपत्रीच खर्च केला जात असल्यामुळे या ठिकाणी ना शेड झाला ना स्मशानभूमी. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ दोन दिवस मृतदेह होता घरातच गतवर्षी दैठणा येथे पावसाळ्यात एकाचा मृत्यू झाला होता़ सतत दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे मृतदेह घरातच ठेवावा लागला होता़ त्यामुळे घरचे व नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागला़ याचे सोयरसूतक कोणालाच नाही़