शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

घरापेक्षा शेतकऱ्यांना ऊस गाळपाची भीती

By admin | Updated: November 28, 2014 01:13 IST

विठ्ठल भिसे ,पाथरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी ऊस उत्पादित केल्यानंतर आपला ऊस कारखान्याने गाळप करावा, अशी चिंता लागून राहते. उसाचे क्षेत्र कमी असो की,

विठ्ठल भिसे ,पाथरीऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी ऊस उत्पादित केल्यानंतर आपला ऊस कारखान्याने गाळप करावा, अशी चिंता लागून राहते. उसाचे क्षेत्र कमी असो की, जास्त मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप होईपर्यंत चिंता लागू राहिेलेली असते. यामुळे उसाला भाव कितीही द्या मात्र ऊस गाळपास वेळेवर न्या, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. पाथरी तालुका हा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात आणि गोदावरी नदीच्या पट्यामध्ये येतो. गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे उच्च पातळीचे बंधारे उभारण्यात आले आहेत. जायकवाडीचे पाणी व गोदावरी पात्रातील बंधाऱ्याचे पाणी यामुळे या भागात मागील २० वर्षापासून शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करतो. पाथरी येथे सहकार तत्वावर सुरू करण्यात आलेल्या गोदावरी दुधना कारखान्यावर या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती घडून आली होती. कालांतराने कारखान्याचे दृष्टचक्र फिरून कारखाना आवसायानात निघाला त्यानंतर शासनाने हा कारखाना विक्री केला. सध्या कारखान्याची विक्री प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने रेणुका शुगरच्या माध्यमातून हा कारखाना खाजगी तत्वावर २००८ पासून सुरू आहे. त्याचबरोबर लिंबा येथील योगेश्वरी शुगर हा खाजगी कारखानाही आहे. या तालुक्यात दोन खाजगी कारखाने असतानाही या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव कधी मिळालाच नाही. कारखान्याची गाळप यंत्रणा व्यवस्थितरित्या राबविली न जात असल्याने शेतकऱ्यांना ऊस गाळपास जाईपर्यंत त्रास सहन करावा लागतो. या दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रामध्ये साधारणत: ४ लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या दिवसात योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही. पर्यायाने उसाची वाढ मोठ्या प्रमाणावर खुंटली गेली आहे. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनाच यावर्षी चांगला उतारा येत आहे. सरासरी उतारा ग्रहीत धरला तर एकरी २५ टनही उसाला उतारा येत नाही. ऊस लागवडीपासून कारखान्याला गळीत हंगामाला जाईपर्यंत शेतकरी कष्ट करतो. परंतु, दरवर्षी कारखाना सुरू झाला की, शेतातील ऊस गाळप करण्यासाठी शेतकरी, ऊस तोडणी मुकदम शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे लागेबांधे करून ऊस तोडणी यंत्रणा शेतामध्ये घेऊन जातो. कोणता कारखाना आपल्या उसास जास्त भाव देणार आहे याची चिंता कधी शेतकरी करीत नाही. यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी उसाचे पीक घेतो खरे परंतु, त्याच्या पदरात मात्र काही पडत नाही. उसाच्या अशा परिस्थितीमुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून कापूस आणि सोयाबिनचे पीक घेतले. परंतु, शेतकऱ्यांच्या कापूस आणि सायोबीन या पिकालाही उतारा मात्र आला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नाडी मात्र बिघडून गेली आहे.