शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:38 AM

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देबीडहून आले ऊस उत्पादक : साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला होते कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.क्रांतीचौकात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे कार्यालय आहे. बीड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक ऊस उत्पादकांनी या इमारतीत जिन्याच्या पायºयावर बसून आंदोलन सुरू केले. कर्मचारी संपावर असल्याने आज या कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. प्रादेशिक सहसंचालक एन. व्ही. गायकवाड यादेखील कार्यालयात आल्या नाहीत. साखर कारखानदार आणि सरकारविरोधात ऊस उत्पादकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. बीड जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी सांगितले की, माजलगाव येथील जयमहेश शुगर इंडस्ट्रिज, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती सहकारी, अशा तीन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर दिलेला नाही. ही रक्कम सुमारे १५० कोटींपर्यंत आहे. मागील ८ महिन्यांपासून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभावावर सरकारने तूर, मका खरेदी केला; पण त्याची रक्कम खात्यावर जमा झाली नाही, तसेच कर्जही मिळाले नाही. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.या आंदोलनात वसंत सोनवणे, शेख युनूस, गणेश साळुंके, शिवाजी शिंदे, बालाजी फुंडकर, लक्ष्मण भागवत, राजू पठाडे, अशोक गायकवाड, सय्यद पठाण यांच्यासह ऊस उत्पादक हजर होते.जोरदार घोषणाबाजीबीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी प्रादेशिक सहसंचालकांच्या (साखर) कार्यालयाच्या तीन मजली इमारतीत दिवसभर धरणे आंदोलन केले. ‘ऊस उत्पादकांचे पैसे मिळालेच पाहिजेत’, पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.मुलीचे लग्न जमले, पैसे नाहीत खात्यातनिपाणी टाकळी येथील हनुमाननगरातील रहिवासी गणपत चव्हाण यांनी आपल्या मुलीची लग्नपत्रिका आणली होती. ४ सप्टेंबर रोजी मुलीचे लग्न ठरविले आहे, असे सांगत चव्हाण म्हणाले की, साखर कारखान्यांनी एफआरपी दिला नाही. ८ महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहे. मुलीचे पुढील महिन्यात लग्न आहे. बँकेतील खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagitationआंदोलन