शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

तलावातील गाळ उपसून शेतकरी कुटुंबाने केला झिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 8:35 PM

वन्यजीवांची भागविली जाते तहान

ठळक मुद्देभारत बटालियनजवळील डोंगरातील तलावातून गाळ उपसा गाळ उपशाचे काम शासकीय पातळीवर हाती घ्यावे

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद :  सातारा परिसरातील भारत बटालियनजवळील डोंगरात छोटे-मोठे पाझर तलाव आहेत, त्यातील गाळ काढण्याचे काम शासनाने हाती घेतले नाही; परंतु तांड्यावरील एका शेतकरी कुटुंबाने तलावातील गाळ उपसून काढला अन् पाण्याचे पाझर सुरू झाले. त्यामुळे हे कुटुंबीय प्रचंड आनंदी झाले आहे. गाळ उपशाचे काम शासकीय पातळीवर हाती घेतल्यास वन्यजीवांना फायदा होऊ शकतो, यात शंका नाही.

गेल्या तीन वर्षांपासून तलावात खोदकाम करून गाळ उपसा करण्यावर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने श्रमदान करण्यावर भर दिला जात आहे. त्यास शासनाच्या यंत्रणेने देखील खूप सहकार्य केले; परंतु यंदा कडक उन्हाळा जाणवत असल्याने कोणतीही यंत्रणा सातारा, देवळाईच्या कुशीत असलेल्या तलावाकडे फिरकलेले नाही. त्याचा परिणाम नागरिकांसह तसेच वन्यजीवांवर झाला आहे. पाण्यासाठी भटकंती करण्यावर वन्यजीवांवरही वेळ आलेली आहे. डोंगर भागात असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पाळीव जनावरांना पाणी देणेदेखील जिकरीचे ठरत आहे.

तांड्यावरील एका शेतावर राबणारा शेतकरी सीताराम पवार यांनी टिकाव, फावडे घेऊन तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले. कुटुंबातील चिमुकल्यांनीही त्यांना सहकार्य दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर निर्माण झाली. गुडघाभर खोदकाम केल्यावर झिऱ्यात पाणी लागले. त्या झिऱ्यातून दीड-दोन तासाला हंडा, दोन हंडे पाणी मिळू लागले. रात्री या झिऱ्यावर डोंगरातील वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

शासकीय यंत्रणेकडे केली मागणीजिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मनपा आणि भारत बटालियनच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आटलेल्या जलस्रोताचे खोलीकरण करण्याची मागणी केली आहे. 

शासकीय योजनेचा लाभ सोलापूर महामार्गावर काम करणाऱ्या यंत्रणेचे सहकार्य घेऊन सातारा, देवळाई परिसरातील तलावातील गाळ काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावातील गाळ काढावा, अशी मागणी शेतकरी कांतीलाल साकला, राजू राठोड, गणेश पवार आदींनी केली आहे. 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबाद