शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, अडत व्यापार्‍यांकडून खरेदीदारांची मनधरणी़

By admin | Updated: May 8, 2014 00:43 IST

नांदेड : गत पंधरा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीची आवक वाढली आहे.

 नांदेड : गत पंधरा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीची आवक वाढली आहे. त्यामुळे आडत व्यापारी व शेतकर्‍यांना खरेदीदारांची मनधरणी करावी लागत आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात हळदीला ८७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर आवक वाढल्याने भाव गडगडला़ अवकाळी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बहुसंख्य शेतकर्‍यांना काढणीला विलंब झाला. यामुळे मध्यंतरीच्या काही कालावधीत हळदीची आवक घटली होती. परंतु गेल्या पंंधरवाड्यापासून बाजारात आवक वाढली असून दिवसभरात जवळपास १५०० ते २ हजार क्विंटल खरेदी होत आहे. दर्जा चांगला असला तरी मंदीमुळे व्यापार्‍याकडून मागणी कमी झाली आहे. सर्व शेतकर्‍यांनी एकाच वेळी विक्रीसाठी हळद बाजारात आणल्याने व्यापार्‍यांना खरेदीदारांची मनधरणी करावी लागत आहे. एका आडत दुकानावर बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे शेतकरी वैतागला आहे़ खरिपाचा हंगाम जवळ येत असल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांना पैशाची आवश्यकता असूनही वेळेवर पैसै मिळत नसल्याने शेतकर्‍यापुढे अडचणी वाढल्या आहेत. मोंढा बाजारात खरेदीदारांची संख्या बोटावर मोजण्याएवढी म्हणजे केवळ चार ते पाच आहे. यामुळे खरेदीदारांच्या मर्जीनुसारच लिलाव बाजार करावा लागत आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने बाहेर जिल्ह्यातून खरेदीदार बोलावल्यास शेतकर्‍यांचा वेळेवर लिलाव होऊन भावही चांगला मिळेल. सोमवारी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला ४६०० पासून ६७०० रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. त्या तुलनेत वसमत व हिंगोली येथील बाजारपेठेत ७००० पेक्षा जास्त भाव मिळाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. मोंढा बाजारात नवीन वर्षात एप्रिल महिन्यात १२३९५ क्विंटल तर मे महिन्यात ६ मे पर्यंत ३८६५ क्विंटल अशी एकूण १६२६० क्विंटल हळदीची आवक झाली आहे. खरेदी करुनही माप होईना- व्यापार्‍यांनी लिलावात हळदीची खरेदी करुनही १० ते १५ दिवस माप होत नसल्याने शेतकर्‍यांना शेतमालाची विक्री करुनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. (प्रतिनिधी)