शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:26 IST

मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

ठळक मुद्देगणपतराव देशमुख : जनआंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद (भाई उद्धवराव पाटील नगरीतून) : मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या राज्य अधिवेशनाचा गुरुवारी समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. विवेकानंद पाटील, आ. पंडित पाटील, प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, संजीवनी हंडे, एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे, जे. एम. म्हात्रे, शांताराम कुंजीर, प्रा. एस. व्ही. जाधव, संपतराव पवार, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, विकास शिंदे, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.आ. देशमुख म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, तर हमीभाव न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही विचार आहेत. दोन्ही पक्ष समविचारी असून, त्यांच्यासोबत जाऊन भाजपचे राज्य आणि केंद्रातील सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले.आ. जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात शेतकरी कामगार पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात येतील. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासह विचारांचे राजकारण करावे लागेल. या कामी कार्यकर्ते घडविण्यासाठी वर्षभरात शंभर प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यात येतील. शेतकरी कामगार पक्ष वाढीसाठी बुथ पातळीपासून काम करावे लागणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामाची फूट पट्टी मोजावी लागेल. आता पक्षाचे काम करणाºयासच पदे देण्यात येतील. राज्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. सध्या ४८ टक्के नागरीकरण झाले आहे. ग्रामीणसह या भागाचाही विचार, पक्षाचे विचार रुजविण्यासाठी करावा लागणार आहे. शिक्षण, सहकारी आदी क्षेत्रात आघाड्या निर्माण कराव्यात लागतील.राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे असून, राज्य घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. मनुवादी घटना आणण्याचा सत्ताधाºयांचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. पाटील यांनी यावेळी केला.प्रवीण गायकवाड म्हणाले की, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न सुटावा, जनविरोधी शिक्षण कायदा बंद करा, आगामी पंचवार्षिक योजनेत शिक्षणावर अधिक तरतूद करण्याची गरज आहे, तर राज्य सरकारच्या कामाचे आॅडिट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. समारोप कार्यक्रमात सर्वच नेते व वक्त्यांनी मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी लावून धरली. तसेच धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. जिल्ह्याचे चिटणीस काकासाहेब शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. अधिवेशनास राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोपगणपतराव देशमुख : जनआंदोलन उभारणारलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद (भाई उद्धवराव पाटील नगरीतून) : मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या राज्य अधिवेशनाचा गुरुवारी समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. विवेकानंद पाटील, आ. पंडित पाटील, प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, संजीवनी हंडे, एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे, जे. एम. म्हात्रे, शांताराम कुंजीर, प्रा. एस. व्ही. जाधव, संपतराव पवार, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, विकास शिंदे, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.आ. देशमुख म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, तर हमीभाव न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही विचार आहेत. दोन्ही पक्ष समविचारी असून, त्यांच्यासोबत जाऊन भाजपचे राज्य आणि केंद्रातील सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले.आ. जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात शेतकरी कामगार पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात येतील. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासह विचारांचे राजकारण करावे लागेल. या कामी कार्यकर्ते घडविण्यासाठी वर्षभरात शंभर प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यात येतील. शेतकरी कामगार पक्ष वाढीसाठी बुथ पातळीपासून काम करावे लागणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामाची फूट पट्टी मोजावी लागेल. आता पक्षाचे काम करणाºयासच पदे देण्यात येतील. राज्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. सध्या ४८ टक्के नागरीकरण झाले आहे. ग्रामीणसह या भागाचाही विचार, पक्षाचे विचार रुजविण्यासाठी करावा लागणार आहे. शिक्षण, सहकारी आदी क्षेत्रात आघाड्या निर्माण कराव्यात लागतील.राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे असून, राज्य घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. मनुवादी घटना आणण्याचा सत्ताधाºयांचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. पाटील यांनी यावेळी केला.प्रवीण गायकवाड म्हणाले की, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न सुटावा, जनविरोधी शिक्षण कायदा बंद करा, आगामी पंचवार्षिक योजनेत शिक्षणावर अधिक तरतूद करण्याची गरज आहे, तर राज्य सरकारच्या कामाचे आॅडिट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. समारोप कार्यक्रमात सर्वच नेते व वक्त्यांनी मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी लावून धरली. तसेच धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. जिल्ह्याचे चिटणीस काकासाहेब शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. अधिवेशनास राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख