शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
5
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
6
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
7
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
8
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
9
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
10
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
11
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
12
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
13
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
14
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
15
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
16
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
17
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
18
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
19
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
20
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:26 IST

मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

ठळक मुद्देगणपतराव देशमुख : जनआंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद (भाई उद्धवराव पाटील नगरीतून) : मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या राज्य अधिवेशनाचा गुरुवारी समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. विवेकानंद पाटील, आ. पंडित पाटील, प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, संजीवनी हंडे, एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे, जे. एम. म्हात्रे, शांताराम कुंजीर, प्रा. एस. व्ही. जाधव, संपतराव पवार, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, विकास शिंदे, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.आ. देशमुख म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, तर हमीभाव न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही विचार आहेत. दोन्ही पक्ष समविचारी असून, त्यांच्यासोबत जाऊन भाजपचे राज्य आणि केंद्रातील सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले.आ. जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात शेतकरी कामगार पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात येतील. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासह विचारांचे राजकारण करावे लागेल. या कामी कार्यकर्ते घडविण्यासाठी वर्षभरात शंभर प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यात येतील. शेतकरी कामगार पक्ष वाढीसाठी बुथ पातळीपासून काम करावे लागणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामाची फूट पट्टी मोजावी लागेल. आता पक्षाचे काम करणाºयासच पदे देण्यात येतील. राज्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. सध्या ४८ टक्के नागरीकरण झाले आहे. ग्रामीणसह या भागाचाही विचार, पक्षाचे विचार रुजविण्यासाठी करावा लागणार आहे. शिक्षण, सहकारी आदी क्षेत्रात आघाड्या निर्माण कराव्यात लागतील.राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे असून, राज्य घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. मनुवादी घटना आणण्याचा सत्ताधाºयांचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. पाटील यांनी यावेळी केला.प्रवीण गायकवाड म्हणाले की, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न सुटावा, जनविरोधी शिक्षण कायदा बंद करा, आगामी पंचवार्षिक योजनेत शिक्षणावर अधिक तरतूद करण्याची गरज आहे, तर राज्य सरकारच्या कामाचे आॅडिट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. समारोप कार्यक्रमात सर्वच नेते व वक्त्यांनी मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी लावून धरली. तसेच धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. जिल्ह्याचे चिटणीस काकासाहेब शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. अधिवेशनास राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोपगणपतराव देशमुख : जनआंदोलन उभारणारलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद (भाई उद्धवराव पाटील नगरीतून) : मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या राज्य अधिवेशनाचा गुरुवारी समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. विवेकानंद पाटील, आ. पंडित पाटील, प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, संजीवनी हंडे, एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे, जे. एम. म्हात्रे, शांताराम कुंजीर, प्रा. एस. व्ही. जाधव, संपतराव पवार, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, विकास शिंदे, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.आ. देशमुख म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, तर हमीभाव न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही विचार आहेत. दोन्ही पक्ष समविचारी असून, त्यांच्यासोबत जाऊन भाजपचे राज्य आणि केंद्रातील सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले.आ. जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात शेतकरी कामगार पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात येतील. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासह विचारांचे राजकारण करावे लागेल. या कामी कार्यकर्ते घडविण्यासाठी वर्षभरात शंभर प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यात येतील. शेतकरी कामगार पक्ष वाढीसाठी बुथ पातळीपासून काम करावे लागणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामाची फूट पट्टी मोजावी लागेल. आता पक्षाचे काम करणाºयासच पदे देण्यात येतील. राज्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. सध्या ४८ टक्के नागरीकरण झाले आहे. ग्रामीणसह या भागाचाही विचार, पक्षाचे विचार रुजविण्यासाठी करावा लागणार आहे. शिक्षण, सहकारी आदी क्षेत्रात आघाड्या निर्माण कराव्यात लागतील.राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे असून, राज्य घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. मनुवादी घटना आणण्याचा सत्ताधाºयांचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. पाटील यांनी यावेळी केला.प्रवीण गायकवाड म्हणाले की, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न सुटावा, जनविरोधी शिक्षण कायदा बंद करा, आगामी पंचवार्षिक योजनेत शिक्षणावर अधिक तरतूद करण्याची गरज आहे, तर राज्य सरकारच्या कामाचे आॅडिट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. समारोप कार्यक्रमात सर्वच नेते व वक्त्यांनी मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी लावून धरली. तसेच धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. जिल्ह्याचे चिटणीस काकासाहेब शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. अधिवेशनास राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख