शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षा उंचावल्या...

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

जालना : खा. रावसाहेब दानवे यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले आहे.

जालना : खा. रावसाहेब दानवे यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले आहे. जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षानंतर जिल्ह्याला हे स्थान मिळाल्याने जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दानवे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे त्यांच्या कुटुंबियांसह समर्थकांना मोठा आनंद झाला आहे. चार दशकांच्या राजकीय वाटचालीतील २४ पैकी २३ निवडणुका जिंकत आपले वर्चस्व कायम राखणार्‍या खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळी २ लाखांवर मताधिक्याने विजयश्री पटकावली. मूळ भोकरदन तालुक्यातील पळसखेडा खुर्द येथील रहिवासी असलेले खा. दानवे यांनी १९७६ साली आपल्याच गावच्या सरपंचपदी विराजमान होत राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. जवखेडा गण पं.स. सदस्य, १९८१ साली ते भोकरदन पं.स. सभापतीपदी विराजमान झाले. १९९० ते ९९ या कार्यकाळात ते भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिले. १९९९ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढविली. तेव्हापासून आजवर चारही लोकसभा निवडणुकांमधून त्यांनी विजय मिळविला. या व्यतिरिक्त रामेश्वर सहकारी साखर कारखाना, पंचायत राज समितीचे राज्याध्यक्ष तसेच इतर विविध पदे त्यांनी भूषविलेली आहेत. खा. दानवे यांच्या राजकीय आयुष्यातील १९८५ सालची विधानसभा निवडणूक अपवाद त्यांनी पराभव पत्करला नाही. खा. दानवे हे एक प्रदीर्घ अनुभवी व मुरब्बी राजकारणी म्हणून या जिल्ह्यात ओळखले गेले आहेत. जालना-खामगाव व सोलापूर जळगाव लोहमार्गाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी गॅसलाईन, बदनापूरजवळ रेल्वेचा मालधक्का, जालना ते औरंगाबाद दुहेरी लोहमार्ग इत्यादी प्रश्न सुटावेत, अशीही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍यांच्या मदतीने विविध विकास कामे करावीत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्टील, बियाणे या उद्योगांमुळे जालना जिल्ह्याचे नाव देशभर पसरलेले असले तरी उद्योग वाढीसाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज असल्याचे उद्योजकांमधून सांगण्यात आले.(प्रतिनिधी) मिळालेल्या संधीचे सोने करू केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, जालना जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर जी जबाबदारी टाकतील, ती यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य व देशात चांगले काम करण्याची आपणास संधी दिल्याने या संधीचे आपण सोने करू, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. दानवे यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या रूपाने जालना जिल्ह्याला प्रथमच केंद्राच्या सत्तेत संधी मिळाली आहे. त्यामुळे दानवे यांच्याकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.