शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या तारेला चिटकून तरूण शेतकऱ्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:26 IST

शेतात मशागतीचे काम करताना शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेल्या मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून ३५ वर्षीय शेतकऱ्याचा रविवारी दुपारच्या सुमारास जरंडी येथे दुर्दैवी मृत्यू झाला.

सोयगाव : शेतात मशागतीचे काम करताना शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेल्या मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून ३५ वर्षीय  शेतकऱ्याचा रविवारी दुपारच्या सुमारास जरंडी येथे दुर्दैवी मृत्यू झाला.

अमोल अशोक पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात चार दिवसांपासून महावितरणच्या शेती पंपाच्या  मुख्यावीज वाहिनीची वीजतार अमोल यांच्या शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेली होती. शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही वीज तार रात्रीच झाडावरून जमिनीवर पडली आणि भीज पावसात जमिनीत पुरल्या गेली.

अमोल हे नेहमीप्रमाणे वीजेची तार झाडावर असल्याचे समजून मोसंबी पिकाच्या नुकसानीची मशागत करत असतानाच अचानक त्यांच्या पायाला वीजेची तार लागली. तार हाताने काढण्याच्या प्रयत्नात त्यांचा तारेला चिटकून जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी शिताफीने त्यांना वीजतारेच्या कचाट्यातून बाहेर काढले.

चार दिवसांपासून परिसरातील शेतकरी तुटलेली वीज  तार जोडण्यासाठी महावितरण विभागाला कळवत होते.  मात्र महावितरण विभागाकडून कुणीही  दुरूस्तीसाठी आले नाही. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप  शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अमोल यांचा मृतदेह तासभर महावितरणच्या सोयगाव कार्यालयासमोर आणून ठेवला. परंतु अखेरीस पोलिसांनी  मध्यस्ती करून मृतदेह  शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी मृत शेतकऱ्याचे मामा तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीराम चौधरी यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी फिर्याद दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक युवराज शिंदे, जमादार संतोष पाईकराव, दिलीप तडवी, संदीप चव्हाण आदी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूelectricityवीज