शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दहा लाखांच्या खंडणीसाठी शेतजमिनीवर अतिक्रमण, ११ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी इटखेडा येथील गट क्रमांक ६५मधील शेतजमिनीवर अतिक्रमण करून त्यातील तार कम्पाउंड ...

औरंगाबाद : दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी इटखेडा येथील गट क्रमांक ६५मधील शेतजमिनीवर अतिक्रमण करून त्यातील तार कम्पाउंड तोडून सिमेंट खांबाचे नुकसान केल्याच्या आरोपावरून सातारा पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. १५ मार्च रोजी ही घटना झालेल्या या घटनेविषयी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हा नोंदविण्यात आला.

तुकाराम रघुनाथ गवळे, मधुकर लक्ष्मण गवळे, बारकू नाथा गवळे, भारत धोंडीराम गायकवाड, कडुबा केशव जंगले, दौलत गोपीनाथ जंगले, कृष्णा कचरू गायकवाड, मनोहर लक्ष्मण गवळे, उमेश रावसाहेब गवळे, प्रवीण पुंजाराम गवळे ( सर्व रा. ईटखेडा )अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार राजेशप्रकाश नथुराम शर्मा (६६,रा.बन्सीलालनगर) यांच्या तक्रारीनुसार १५ मार्च रोजी आरोपींनी ईटखेडा येथील त्यांच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीवरील तारेचे कुंपण आणि सिमेंटचे खांब उखडून फेकले. ही जमीन आमची आहे, असे म्हणून त्यांनी अतिक्रमण केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर शर्मा आणि त्यांचे कर्मचारी मौजकर हे शेतात गेले असता आरोपींनी त्यांना दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर तुम्हाला जमिनीवर पाय ठेवू देणार नाही, तुमचा गेम करून टाकू, अशी धमकी दिली. या घटनेनंतर त्यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चार महिन्यांनंतरही आरोपी ऐकत नसल्याचे पाहून शेवटी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या आरोपींची तक्रार केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक डी. एस. सिनगारे यांनी चौकशी केली असता, तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार १४ जुलै रोजी शर्मा यांच्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक सिनगारे तपास करीत आहेत.