शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मित’च्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रबोधन

By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST

अंबाजोगाई: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांवर सातत्याने होणारे आघात. कोलमडणारी आर्थिक स्थिती. आत्महत्या यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे ‘स्मित’ हरवले आहे.

 अंबाजोगाई: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांवर सातत्याने होणारे आघात. यामुळे शेतकर्‍यांची कोलमडणारी आर्थिक स्थिती. परिणामी, कर्जबाजारीपणमुळे होणार्‍या आत्महत्या यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे ‘स्मित’ हरवले आहे. हरवलेले हे स्मित पुन्हा त्यांच्या चेहर्‍यावर दिसावे यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने शेतकर्‍यांसाठी दिलासादायी उपक्रमांची अंमलबजावणी अंबाजोगाई तालुक्यातील १० खेड्यांमध्ये सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती पूर्णत: खालावली आहे. वाढती महागाई, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, बियाणांच्या वाढत्या किमती, तणनाशक, कीटकनाशक यांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सामान्य शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी व शेतकर्‍यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढता येईल? याबाबतच्या अनेक उपाययोजना तज्ञ शास्त्रज्ञ व कृषितज्ज्ञ यांच्या साह्याने आखण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पाण्याचे नियोजन, बियाणांची उपलब्धता, खरीपपूर्व शेतीचे नियोजन, मिश्र पिके घेणे, घरच्या बियाणांची उगवण क्षमता, तणनाशक व अंतर्गत मशागत, पेरणीपूर्व किडीचा बंदोबस्त, मनुष्यबळ व यंत्रशेतीचे नियोजन, कूपनलिकांचे पुनर्भरण अशा महत्त्वपूर्ण विषयांवर गावोगावी जनजागृती सुरू असून होणार्‍या शेतकरी मेळाव्यास डॉ. गुट्टे, दीपक देशपांडे यांच्यासह ज्ञानप्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमाचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. हा उपक्रम घेतल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर) शेतकर्‍यांमध्ये समाधान १० खेड्यांमधील शेतकर्‍यांशी साधला थेट संवाद. तज्ज्ञ व्यक्तींंनी दिले शेतीविषयक मार्गदर्शन. शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन महत्त्वाचे. शेतकर्‍यांमधून होतेय समाधान व्यक्त. पावसाळ्यापूर्वी दिलेल्या प्रशिक्षणाचा होणार फायदा.