शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

देशात अतिसारामुळे अकरा टक्के बालमृत्यू

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

परभणी : देशात अतिसार व जुलाबामुळे ११ टक्के बालकांचा मृत्यू होतो़ हे प्रमाण साधारणत: उन्हाळा व पावसाळ्यात आहे़

परभणी : देशात अतिसार व जुलाबामुळे ११ टक्के बालकांचा मृत्यू होतो़ हे प्रमाण साधारणत: उन्हाळा व पावसाळ्यात आहे़ कुपोषित मुले व दोन वर्षांखालील मुलांचा यात अधिक समावेश असतो़ त्यामुळे अतिसारापासून बचाव करण्यासाठी शुद्ध पाणी आणि योग्य आहार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी केले़
परभणीत जि़ प़ आरोग्य विभागाच्या वतीने ८ आॅगस्टपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवाडा साजरा केला जात आहे़
या अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डुंबरे बोलत होते़ अतिसारामुळे एकही बालमृत्यू होऊ नये, हा पंधरवडा पाळण्यामागचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले़ २८ जूून ते २ आॅगस्ट या काळात अतिसार नियंत्रण कार्यक्रमा संदर्भात योजनांची अंमलबजावणी करण्यात आली़ ४ ते ८ आॅगस्ट या काळात अर्भक व लहान बालके यांच्या आजारासंबंधी जनजागृती केली जाणार आहे़ या मोहिमेत पाच वर्षाखालील बालके, ज्या बालकांना अतिसार आहे आणि कुपोषित आहेत अशा बालकांचे माता, पिता व पालक लाभार्थी असणार आहेत़
गावात गृहभेटी देऊन पाच वर्षाखालील बालकांना ओआरएस पाकिटे व अतिसार प्रतिबंधाविषयी माहिती दिली जाणार आहे़ तसेच कुपोषित मुले ओळखून त्यांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा केली जाणार आहे, अशी माहितीही डुंबरे यांनी दिली़ (प्रतिनिधी)