शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

कचऱ्याचे वर्गीकरण नसल्याने नगरविकासच्या पथकासमोर मनपाची नाचक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:42 IST

पथकाने मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले.

ठळक मुद्दे मिक्स कचरा थेट प्रक्रिया केंद्रावरपुढील अनुदानाबाबत साशंकता

औरंगाबाद : शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी ८५ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते, असा दावा मनपाने राज्य शासनाकडे केला आहे. नगरविकास विभागाने नेमलेल्या अधिकाऱ्यांचे पथक अचानक शहरात दाखल झाले. या पथकाने थेट कचरा प्रक्रिया केंद्रावर जाऊन महापालिकेच्या कारभाराची शहानिशा केली. १०० टक्के कचरा मिक्स पद्धतीने प्रक्रिया केंद्रावर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. मनपाच्या या नाचक्कीमुळे शासनाकडून पुढील अनुदान मिळेल किंवा नाही, यावर आता साशंकता व्यक्त केली जात आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे एक पथक दोन दिवसांपासून शहरात तळ ठोकून होते. या पथकाने शहरातील कचरा संकलन आणि प्रक्रिया प्रकल्पांची पाहणी केली.  चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पावर शहरातून मिक्स कचरा येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पथकातील अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मनपाने शासनाकडे केलेले दावे किती फोल आहेत, हे उघडकीस आले. मिक्स कचऱ्यावर मनपा अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरेही देता आली नाहीत.

शहरात कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर राज्य शासनाने मनपाला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील २५ कोटी रुपये मनपाला देण्यात आले. यातून चिकलठाणा येथे प्रकल्प उभा राहिला. नक्षत्रवाडी, पडेगाव प्रकल्प उभारणे सुरू आहे. मनपाने आता सुधारित प्रस्ताव सादर करून हे सर्व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १४२ कोटी रुपये लागणार असल्याचे शासनाला म्हटले आहे. याची शहानिशा करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख दांडेकर, उपसचिव सुधाकर बोबडे यांच्या पथकाने पाहणी केली. 

कंपनीच्या चुका मनपाच्या पथ्यावरशहरातील प्रत्येक नागरिकाच्या दारावर जाऊन कचरा जमा करण्यासाठी मनपाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीची नेमणूक केली आहे. कंपनी शहरात जिथे कुठे कचरा साचलेला दिसेल तेथील तो उचलून नेत आहे. ४या कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात विटा, दगड, टायरचे तुकडे टाकणे सुरू केले आहे. कंपनी शंभर टक्के मिक्स कचरा प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकत आहे. कंपनीच्या चुकांचे परिणाम मनपाला भोगावे लागत आहेत.

पथकाकडून नाराजीस्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख दांडेकर आणि उपसचिव सुधाकर बोबडे यांनी राज्य शासनाने दिलेला २५ कोटींचा निधी कुठे आणि कसा खर्च केला याची तपासणी केली. या पथकाच्या अहवालावरच पुढील टप्प्यातील निधी अवलंबून आहे. पथकाने मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारfundsनिधी