शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कचऱ्याचे वर्गीकरण नसल्याने नगरविकासच्या पथकासमोर मनपाची नाचक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:42 IST

पथकाने मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले.

ठळक मुद्दे मिक्स कचरा थेट प्रक्रिया केंद्रावरपुढील अनुदानाबाबत साशंकता

औरंगाबाद : शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी ८५ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते, असा दावा मनपाने राज्य शासनाकडे केला आहे. नगरविकास विभागाने नेमलेल्या अधिकाऱ्यांचे पथक अचानक शहरात दाखल झाले. या पथकाने थेट कचरा प्रक्रिया केंद्रावर जाऊन महापालिकेच्या कारभाराची शहानिशा केली. १०० टक्के कचरा मिक्स पद्धतीने प्रक्रिया केंद्रावर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. मनपाच्या या नाचक्कीमुळे शासनाकडून पुढील अनुदान मिळेल किंवा नाही, यावर आता साशंकता व्यक्त केली जात आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे एक पथक दोन दिवसांपासून शहरात तळ ठोकून होते. या पथकाने शहरातील कचरा संकलन आणि प्रक्रिया प्रकल्पांची पाहणी केली.  चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पावर शहरातून मिक्स कचरा येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पथकातील अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मनपाने शासनाकडे केलेले दावे किती फोल आहेत, हे उघडकीस आले. मिक्स कचऱ्यावर मनपा अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरेही देता आली नाहीत.

शहरात कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर राज्य शासनाने मनपाला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील २५ कोटी रुपये मनपाला देण्यात आले. यातून चिकलठाणा येथे प्रकल्प उभा राहिला. नक्षत्रवाडी, पडेगाव प्रकल्प उभारणे सुरू आहे. मनपाने आता सुधारित प्रस्ताव सादर करून हे सर्व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १४२ कोटी रुपये लागणार असल्याचे शासनाला म्हटले आहे. याची शहानिशा करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख दांडेकर, उपसचिव सुधाकर बोबडे यांच्या पथकाने पाहणी केली. 

कंपनीच्या चुका मनपाच्या पथ्यावरशहरातील प्रत्येक नागरिकाच्या दारावर जाऊन कचरा जमा करण्यासाठी मनपाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीची नेमणूक केली आहे. कंपनी शहरात जिथे कुठे कचरा साचलेला दिसेल तेथील तो उचलून नेत आहे. ४या कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात विटा, दगड, टायरचे तुकडे टाकणे सुरू केले आहे. कंपनी शंभर टक्के मिक्स कचरा प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकत आहे. कंपनीच्या चुकांचे परिणाम मनपाला भोगावे लागत आहेत.

पथकाकडून नाराजीस्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख दांडेकर आणि उपसचिव सुधाकर बोबडे यांनी राज्य शासनाने दिलेला २५ कोटींचा निधी कुठे आणि कसा खर्च केला याची तपासणी केली. या पथकाच्या अहवालावरच पुढील टप्प्यातील निधी अवलंबून आहे. पथकाने मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारfundsनिधी