शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ३३ शहरांत पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 11:21 IST

विभागातील १३ शहरांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडल्यामुळे तेथे भीषण पाणीटंचाई आहे.

ठळक मुद्देबारा दिवसांनी पाणीपुरवठाअनेक शहरांना लांबवरून पाणी आणण्याचे आव्हान

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४ महापालिका, ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश शहरे तहानली आहेत. मराठवाड्यातील ३३ शहरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, त्या शहरांना पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. मराठवाड्यातील शहरी भागांतील पाणीटंचाई अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठक घेतली. पाणीटंचाईबाबत प्रशासनाने संवेदनशील राहावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बैठकीला नगरपालिका विभागाचे प्रादेशिक उपसंचालक शिवाजी शिंदे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विभागातील १३ शहरांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडल्यामुळे तेथे भीषण पाणीटंचाई आहे, तर मे महिन्याअखेरपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असलेल्या २० शहरांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक शहरांना दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या औरंगाबाद शहराची जीवनरेखा असलेले जायकवाडी धरण मृतसाठ्यात गेले आहे. धरणात पाणी असले तरी औरंगाबाद शहराला आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होतो आहे. नगरपालिका, नगर पंचायतींना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेवराई नगरपालिकेने पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विभागातील ७९ शहरांपैकी बहुतांश शहरी भागांतील नागरिकांना खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ही १३ शहरे टँकरवरऔरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर शहरांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे टँकरशिवाय पाणीपुरवठ्याचा पर्याय शिल्लक नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन व घनसावंगी, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, नांदेड जिल्ह्यातील उमरी व किनवट, बीड जिल्ह्यातील वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, लातूर जिल्ह्यातील औसा अशा १३ शहरांना पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या प्रकल्पांतील पाणी संपल्यामुळे त्या शहरांची तहान टँकरने भागविण्यात येत आहे.

२० शहरांना मे अखेरपर्यंत पाणी पुरेलसिल्लोड, कन्नड, बदनापूर, पाल, सोनपेठ, गंगाखेड, कंधार, धर्माबाद, बिलोली, लोहा, हदगाव, मुखेड, मुदखेड, हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, बीड, रेणापूर व लोहारा बु. या २० शहरांना पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पांत मे अखेरपर्यंत पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. यातील निम्म्या शहरांना १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे.

सिल्लोडला ५८ कि़मी.हून पाणीऔरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि वैजापूर शहरात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. सिल्लोडला पाणीपुरवठा करणा-या खेळणा प्रकल्पाने एप्रिल अखेरपर्यंत तहान भागविली. आता प्रकल्प तळाला गेला आहे, त्यामुळे पाणीटंचाईच्या अनुषंगाने ५८ किलोमीटर लांब असलेल्या केळगाव-खडकपूर्णा प्रकल्पातून टँकरद्वारे पाणी आणण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान, सिल्लोड, भोकरदन आणि जाफ्राबाद शहरांसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना अपूर्ण स्थितीमध्ये आहे. योजना पूर्ण झाली असती तर या तिन्ही शहरांना सध्याच्या दुष्काळात दिलासा मिळाला असता. योजनेचे जाफ्राबादपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. तेथून भोकरदन व सिल्लोडसाठी पाणी आणण्याबाबतही निर्णय होणे शक्य आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईMarathwadaमराठवाडा