शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

मराठवाड्यातील ३३ शहरांत पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 11:21 IST

विभागातील १३ शहरांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडल्यामुळे तेथे भीषण पाणीटंचाई आहे.

ठळक मुद्देबारा दिवसांनी पाणीपुरवठाअनेक शहरांना लांबवरून पाणी आणण्याचे आव्हान

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४ महापालिका, ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश शहरे तहानली आहेत. मराठवाड्यातील ३३ शहरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, त्या शहरांना पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. मराठवाड्यातील शहरी भागांतील पाणीटंचाई अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठक घेतली. पाणीटंचाईबाबत प्रशासनाने संवेदनशील राहावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बैठकीला नगरपालिका विभागाचे प्रादेशिक उपसंचालक शिवाजी शिंदे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विभागातील १३ शहरांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडल्यामुळे तेथे भीषण पाणीटंचाई आहे, तर मे महिन्याअखेरपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असलेल्या २० शहरांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक शहरांना दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या औरंगाबाद शहराची जीवनरेखा असलेले जायकवाडी धरण मृतसाठ्यात गेले आहे. धरणात पाणी असले तरी औरंगाबाद शहराला आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होतो आहे. नगरपालिका, नगर पंचायतींना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेवराई नगरपालिकेने पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विभागातील ७९ शहरांपैकी बहुतांश शहरी भागांतील नागरिकांना खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ही १३ शहरे टँकरवरऔरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर शहरांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे टँकरशिवाय पाणीपुरवठ्याचा पर्याय शिल्लक नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन व घनसावंगी, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, नांदेड जिल्ह्यातील उमरी व किनवट, बीड जिल्ह्यातील वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, लातूर जिल्ह्यातील औसा अशा १३ शहरांना पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या प्रकल्पांतील पाणी संपल्यामुळे त्या शहरांची तहान टँकरने भागविण्यात येत आहे.

२० शहरांना मे अखेरपर्यंत पाणी पुरेलसिल्लोड, कन्नड, बदनापूर, पाल, सोनपेठ, गंगाखेड, कंधार, धर्माबाद, बिलोली, लोहा, हदगाव, मुखेड, मुदखेड, हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, बीड, रेणापूर व लोहारा बु. या २० शहरांना पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पांत मे अखेरपर्यंत पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. यातील निम्म्या शहरांना १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे.

सिल्लोडला ५८ कि़मी.हून पाणीऔरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि वैजापूर शहरात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. सिल्लोडला पाणीपुरवठा करणा-या खेळणा प्रकल्पाने एप्रिल अखेरपर्यंत तहान भागविली. आता प्रकल्प तळाला गेला आहे, त्यामुळे पाणीटंचाईच्या अनुषंगाने ५८ किलोमीटर लांब असलेल्या केळगाव-खडकपूर्णा प्रकल्पातून टँकरद्वारे पाणी आणण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान, सिल्लोड, भोकरदन आणि जाफ्राबाद शहरांसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना अपूर्ण स्थितीमध्ये आहे. योजना पूर्ण झाली असती तर या तिन्ही शहरांना सध्याच्या दुष्काळात दिलासा मिळाला असता. योजनेचे जाफ्राबादपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. तेथून भोकरदन व सिल्लोडसाठी पाणी आणण्याबाबतही निर्णय होणे शक्य आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईMarathwadaमराठवाडा