शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

धरणापासूनचे दूर अंतर पाणीपुरवठ्यासाठी खर्चिक

By admin | Updated: July 26, 2014 00:38 IST

जगदीश पिंगळे, बीड मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले असले तरीही एकूण धरणातील पाणी फक्त १५ टक्केच राहिले आहे.

जगदीश पिंगळे, बीडमराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले असले तरीही एकूण धरणातील पाणी फक्त १५ टक्केच राहिले आहे. धरणांपासून ते शहरापर्यंतचे अंतर बरेच असल्याने पाणीपुरवठ्यासाठी करावा लागणारा वाढता खर्च ही प्रशासनासमोर डोकेदुखी बनली आहे.मराठवाड्यातील ८०४ धरणात सध्या २३ जुलैच्या आकडेवारीनुसार केवळ १५ टक्केच पाणी शिल्लक आहे. जायकवाडीत तर ४१ दलघमी म्हणजे केवळ २ टक्केच पाणी आहे. मराठवाड्यातील एकूण लहान मोठ्या धरणांची पाणी साठवण क्षमता ७५९९ दलघमी आहे पण सध्या ११०३ दलघमी पाणी आहे. सिध्देश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीना, कोळेगाव ही धरणे तर मृतसाठ्याच्या खाली आहेत.मराठवाड्यात २५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यात जाफराबाद, जालना, बदनापूर, घनसांगवी, मंठा, गेवराई, शिरूर कासार, जळकोट, बिलोली, मुखेड, कंधार, हदगाव, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, अर्धापूर, नायगाव खुर्द, परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा, सेनगाव, मानवत या तीस तालुक्यांचा समावेश आहे. फक्त उमरगा, लोहारा या तालुक्यात शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला.‘कडा’ चे मुख्य अभियंता जोगदंड ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले जायकवाडीत गतवर्षी एप्रिलमध्येच शून्य टक्केखाली पाण्याची टक्केवारी आली होती त्या तुलनेत यंदा जुलैत पाणी प्रश्न चिंताजनक झाला आहे पाऊस योग्य झाल्यास अडचणी दूर होतील. मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया आणि कडाचे जलअभ्यासक अभियंता अरूण घाटे म्हणाले, आता दूरच्या धरणातील पाणी आणणे परवडणारे नाही. उस्मानाबाद शहरास १२० किमी अंतरावरून उजनी धरणातून पाणी येते त्यासाठी विजेचा खर्च काही कोटीच्या घरात जातो. मांजरा धरणातून अंबाजोगाई अन्य शहरांना पाणी पुरवठा होतो ही शहरेही धरणापासून खूप दूर आहेत. परळी, शहर आणि थर्मल पॉवरस्टेशनला पाणीपुरवठा सोनपेठ भागातून होतो हे अंतरही खर्चिक आहे.औरंगाबादची लोकसंख्या १९७१ ला जेव्हा जायकवाडी पूर्ण झाले तेव्हा १ लाख २० हजारांच्या आसपास होती आता २०१४ मध्ये ती औरंगाबाद आणि विस्तारित वसाहतीत १५ लाखांच्या पुढे आहे. औरंगाबादला पाणीपुरवठा करण्यासाठी विजेचा खर्च ३० कोटीच्या आसपास येतो. पण नगर आणि जालना जिल्ह्णातील गावे दूर आहेत. डॉ लोहिया म्हणाले, दरवर्षी आम्ही मराठवाडा वैधानिक मंडळाच्या बैठकीत या सूचना मांडीत असतो पण त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.