शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:54 AM

पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेला असल्याचा आरोप राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केला.

ठळक मुद्देजयकुमार रावल : राज्यातील पर्यटन केंद्रांना पायाभूत सेवा-सुविधा देणार

औरंगाबाद : पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेला असल्याचा आरोप राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केला.पर्यटन विभागाच्या नेतृत्वात औरंगाबादेत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन केले आहे. यासाठी २९ बुद्धिस्ट देशांतील २०० प्रतिनिधी आले आहेत. या प्रतिनिधींमुळे राज्याचे पर्यटन जागतिक स्तरावर पोहोचले आहे. या परिषदेचे भारतात पहिल्यांदाच आयोजन केले जात असून, त्याचा मान महाराष्ट्राला मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील पर्यटनातील अडचणी आणि उपाययोजना विषयी प्रसारमाध्यमांशी जयकुमार रावल बोलत होते. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी पायाभूत सुविधा, पर्यटकांना आकर्षित केले जाईल, असे उपक्रम राबवता येऊ शकातात. त्या ठिकाणी हा विभाग सोयी-सुविधा पुरवत नाही. त्या पुरविण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. मात्र, त्यासाठी परवानगीही देण्यात येत नाही. अनेक योजना अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पडून आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेही रावल यांनी स्पष्ट केले. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यात पर्यटकांसाठी लागणाºया अत्यावश्यक सेवा-सुविधापासून प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करीत आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही. याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे, औरंगाबाद ते जळगाव, चंद्रपूर, लोणार, सिंधुदुर्ग या ठिकाणांना कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकाच ठिकाणाहून राज्यातील प्रत्येक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जाण्यासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, तिकीट, निवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एकाच ठिकाणाहून सर्व काहीपर्यटन विभाग पर्यटकांना एकाच ठिकाणाहून राज्यातील कोणत्याही पर्यटनस्थळाच्या ठिकाणची निवास व्यवस्था, वाहतूक, तिकीट आणि दिवसभर वास्तू पाहिल्यानंतर सायंकाळी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देईल. यामुळे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्या भागातील नागरिकांना महाराष्ट्रातील पर्यटनासाठी पाठवून देईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही रावल यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBuddha Cavesबौद्ध लेणीJaykumar Rawalजयकुमार रावल