शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

विकास कोसो दूर! ५५ आमदार, ९ खासदार असलेल्या मराठवाड्याचे नेतृत्व कोण करणार?

By नंदकिशोर पाटील | Updated: January 30, 2023 15:46 IST

मराठवाड्यातील सध्याचे नेते मतदारसंघाच्या पलीकडे फारसा विचार करत नाहीत.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या गुंतवणूकदारांच्या जागतिक परिषदेत कोट्यवधी रुपयांचे गुंतवणूक करार करताना मराठवाड्यातील परभणी, हिंगोलीसारखे औद्योगिकदृष्ट्या मागासलेले जिल्हे आठवले नाही का, असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून गुंतवणुकीचा प्रस्ताव येतो, तेव्हा मुंबई, पुणे अथवा नागपूर या शहरांपलीकडे विचार होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. औरंगाबाद येथे ऑरिकसारखी पंचतारांकित औद्योगिक वसाहत ओस पडली आहे. ग्रीनकोसारखी एखादी कंपनी प्रकल्प उभारण्यास इच्छुक असते. सरकारने आग्रह करून एखाद्या कंपनीला मराठवाड्यात गुंतवणूक करण्यास भाग पाडले असे अपवादाने घडते. त्यामुळे चव्हाण यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. कोणत्याही प्रदेशाचा विकास हा राजकीय इच्छाशक्ती आणि दबाव गटावर अवलंबून असतो. विकास ही नैसर्गिक प्रक्रिया नाही. मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो. मराठवाड्यासारख्या भौगोलिकदृष्ट्या मागास भागात तर राजकीय इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक. आपलं घोडं नेमकं इथेच पेंड खातं!

मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी आजवर प्रयत्न झाले नाही, असे नाही. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकारातून नांदेड येथे, तर विलासराव देशमुख यांनी लातूर येथे काही उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकार आणि प्रयत्नातून औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अर्थात डीएमआयसीची स्थापना झाली. या प्रदेशातील कापसाचे पीक लक्षात घेऊन टेक्सकॉमच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या आणि खासगी यंत्रमाग सुरू करण्यात आले; पण लवकरच ते बंद पडले. तीच गत नांदेडच्या गोदावरी गारमेंट, बीडच्या टॅनरी आणि उस्मानाबादच्या स्कूटर, काच आणि सायकल प्रकल्पाची झाली. जालन्यात गेल्या पाच वर्षांपासून फूड पार्क होऊ घातला आहे. लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीतून अद्याप एकही कोच तयार होऊ बाहेर पडलेला नाही.

खरे तर विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाबाबत राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असायला हवी, हे १९५३ साली झालेल्या ‘नागपूर करार’ने ठरविण्यात आले. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर या करारासंबंधी कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी फारसी बांधिलकी दाखवली नाही. मागास भागाच्या विकासासाठी राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या कलम ३७१ मधील उपकलम २ नुसार वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यात आली. या माध्यमातून समन्यायी निधी वाटपाचे अधिकार राज्यपालांकडे आले; परंतु एखादा अपवाद वगळता इतर राज्यपालांनी त्यात स्वारस्य दाखवले नाही. या मंडळाची मुदत संपून दोन वर्षं झाले. अजून पुनर्रचना झालेली नाही. यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मराठवाड्यातील सध्याचे नेते मतदारसंघाच्या पलीकडे फारसा विचार करत नाहीत. अशोकराव चव्हाण, अमित देशमुख, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यासाठी त्यांना मतदारसंघाबाहेर पडावे लागेल. औरंगाबाद हे विभागीय ठिकाण आहे. इथे येऊन संपूर्ण प्रदेशासाठी पुढाकार घ्यावा लागेल. इतरांच्या पालख्या वाहून काही होणार नाही. स्वत:ला किमान प्रदेशापुरते सिद्ध करा, भविष्यात संधी आपोआप चालून येईल.

अबब ! किती हे लोकप्रतिनिधी !!मराठवाड्यात विधानसभा आणि विधान परिषदेचे मिळून तब्बल ५५ आमदार, ८ खासदार, ३ राज्यसभा सदस्य आहेत. गोवा, झारखंड, सिक्कीम आणि पद्दुचेरी या राज्यांपेक्षाही अधिक लोकप्रतिनिधी असलेला हा प्रदेश आज सक्षम नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रात दोन राज्यमंत्री, राज्याच्या मंत्रिमंडळात चार कॅबिनेट मंत्री आहेत. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत आणखी काही जणांचा नंबर लागू शकतो. पण, ही सगळी लोकशक्ती मराठवाड्याच्या विकासासाठी पक्षीय भेद टाळून एकत्र येणार का, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाPoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाणraosaheb danveरावसाहेब दानवेPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेAmit Deshmukhअमित देशमुखAurangabadऔरंगाबाद