शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

विकास कोसो दूर! ५५ आमदार, ९ खासदार असलेल्या मराठवाड्याचे नेतृत्व कोण करणार?

By नंदकिशोर पाटील | Updated: January 30, 2023 15:46 IST

मराठवाड्यातील सध्याचे नेते मतदारसंघाच्या पलीकडे फारसा विचार करत नाहीत.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या गुंतवणूकदारांच्या जागतिक परिषदेत कोट्यवधी रुपयांचे गुंतवणूक करार करताना मराठवाड्यातील परभणी, हिंगोलीसारखे औद्योगिकदृष्ट्या मागासलेले जिल्हे आठवले नाही का, असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून गुंतवणुकीचा प्रस्ताव येतो, तेव्हा मुंबई, पुणे अथवा नागपूर या शहरांपलीकडे विचार होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. औरंगाबाद येथे ऑरिकसारखी पंचतारांकित औद्योगिक वसाहत ओस पडली आहे. ग्रीनकोसारखी एखादी कंपनी प्रकल्प उभारण्यास इच्छुक असते. सरकारने आग्रह करून एखाद्या कंपनीला मराठवाड्यात गुंतवणूक करण्यास भाग पाडले असे अपवादाने घडते. त्यामुळे चव्हाण यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. कोणत्याही प्रदेशाचा विकास हा राजकीय इच्छाशक्ती आणि दबाव गटावर अवलंबून असतो. विकास ही नैसर्गिक प्रक्रिया नाही. मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो. मराठवाड्यासारख्या भौगोलिकदृष्ट्या मागास भागात तर राजकीय इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक. आपलं घोडं नेमकं इथेच पेंड खातं!

मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी आजवर प्रयत्न झाले नाही, असे नाही. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकारातून नांदेड येथे, तर विलासराव देशमुख यांनी लातूर येथे काही उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकार आणि प्रयत्नातून औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अर्थात डीएमआयसीची स्थापना झाली. या प्रदेशातील कापसाचे पीक लक्षात घेऊन टेक्सकॉमच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या आणि खासगी यंत्रमाग सुरू करण्यात आले; पण लवकरच ते बंद पडले. तीच गत नांदेडच्या गोदावरी गारमेंट, बीडच्या टॅनरी आणि उस्मानाबादच्या स्कूटर, काच आणि सायकल प्रकल्पाची झाली. जालन्यात गेल्या पाच वर्षांपासून फूड पार्क होऊ घातला आहे. लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीतून अद्याप एकही कोच तयार होऊ बाहेर पडलेला नाही.

खरे तर विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाबाबत राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असायला हवी, हे १९५३ साली झालेल्या ‘नागपूर करार’ने ठरविण्यात आले. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर या करारासंबंधी कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी फारसी बांधिलकी दाखवली नाही. मागास भागाच्या विकासासाठी राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या कलम ३७१ मधील उपकलम २ नुसार वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यात आली. या माध्यमातून समन्यायी निधी वाटपाचे अधिकार राज्यपालांकडे आले; परंतु एखादा अपवाद वगळता इतर राज्यपालांनी त्यात स्वारस्य दाखवले नाही. या मंडळाची मुदत संपून दोन वर्षं झाले. अजून पुनर्रचना झालेली नाही. यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मराठवाड्यातील सध्याचे नेते मतदारसंघाच्या पलीकडे फारसा विचार करत नाहीत. अशोकराव चव्हाण, अमित देशमुख, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यासाठी त्यांना मतदारसंघाबाहेर पडावे लागेल. औरंगाबाद हे विभागीय ठिकाण आहे. इथे येऊन संपूर्ण प्रदेशासाठी पुढाकार घ्यावा लागेल. इतरांच्या पालख्या वाहून काही होणार नाही. स्वत:ला किमान प्रदेशापुरते सिद्ध करा, भविष्यात संधी आपोआप चालून येईल.

अबब ! किती हे लोकप्रतिनिधी !!मराठवाड्यात विधानसभा आणि विधान परिषदेचे मिळून तब्बल ५५ आमदार, ८ खासदार, ३ राज्यसभा सदस्य आहेत. गोवा, झारखंड, सिक्कीम आणि पद्दुचेरी या राज्यांपेक्षाही अधिक लोकप्रतिनिधी असलेला हा प्रदेश आज सक्षम नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रात दोन राज्यमंत्री, राज्याच्या मंत्रिमंडळात चार कॅबिनेट मंत्री आहेत. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत आणखी काही जणांचा नंबर लागू शकतो. पण, ही सगळी लोकशक्ती मराठवाड्याच्या विकासासाठी पक्षीय भेद टाळून एकत्र येणार का, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाPoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाणraosaheb danveरावसाहेब दानवेPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेAmit Deshmukhअमित देशमुखAurangabadऔरंगाबाद