शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी रुपये जमा

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

उस्मानाबाद : काही बँकांकडून पीक कर्जावर जादा व्याजदर वसूल केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक

उस्मानाबाद : काही बँकांकडून पीक कर्जावर जादा व्याजदर वसूल केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना संबधित बँकेना भेटी देऊन तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध बँकाची तपासणी केली होती. यात अनेक शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर जादा व्याजदर लावून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले होते. यातील दोन कोटी संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पुन्हा जमा करण्यात आले आहेत.२०१२-१३ या वर्षासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु, अनेक बँकांनी शेतकऱ्यांना सात टक्के व त्याहीपेक्षा अधिक व्याज अकारल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याची गंभीर दखल घेत अशा बँकांची चौकशी करण्याची पथकांची स्थापना केली होती. पथकांनी केलेल्या चौकशीत शेतकऱ्यांच्या तक्रारीप्रमाणे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार ज्या बँकांनी अतिरिक्त व्याज घेतले आहे, अशा बँकांनी ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, असे निर्देश दिले होते. तसेच सदरील कार्यवाहीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडे अहवाल आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल दोन कोटी रूपये जमा झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर जादा व्याज व सेवा शुल्क लावले आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेने पैसे जमा केले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी सदरील बँकेची लेखी तक्रार द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.