शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

‘जीएमआयआरडीआर’ सुरू करण्याचा निर्णय

By admin | Published: December 23, 2014 12:35 AM

औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे यांच्या नावे विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील ग्रामविकास संशोधन संस्था

औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे यांच्या नावे विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील ग्रामविकास संशोधन संस्था (जीएमआयआरडीआर) सुरू करण्याचा निर्णय सोमवारी रत्नागिरी येथे झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. काही दिवसांपूर्वी अधिसभा सदस्य प्रा. गजानन सानप यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावे विद्यापीठाने ग्रामविकास संशोधन संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव कुलगुरुंना दिला होता. आजच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर कुलगुरु डॉ. चोपडे यांनी ऐनवेळचा विषय बैठकीसमोर मांडला. मराठवाड्याचे सुपुत्र तथा दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरील ग्रामविकास संशोधन संस्था सुरू करावी, असा तो विषय होता. तेव्हा बैठकीतील उपस्थित सर्व सदस्यांनी या विषयास एकमताने मंजुरी दिली. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे सुरू केल्या जाणारी ही संस्था कशी असावी, तिचे कार्य व अभ्यासक्रम कसे असावे, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या संस्थेला शासनाची मान्यता मिळविण्यासाठी डॉ. शिवाजी मदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शिवाय बैठकीसमोर विद्यापीठात सध्या ‘बॅचलर आॅफ व्होकेशनल कोर्स’ सुरू आहे. त्याअंतर्गत पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग’ हा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारचा कोर्स संपूर्ण राज्यात कुठेही नाही, हे विशेष!बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य उल्हास उढाण यांनी मराठवाड्यातील दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता विद्यापीठातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये ‘एनएसएस’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे समुपदेशन केले जावे, हा ठराव मांडला. रत्नागिरी येथील विद्यापीठाच्या सेंटर फॉर मरिन रिसर्च या उपकेंद्रासाठी सहायक प्राध्यापकांच्या ६, तंत्र सहायक व संशोधन सहायकाची प्रत्येकी एक याप्रमाणे २ अशा एकूण ८ जागा भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या उपकेंद्राला शासनाने ३ एकर जागा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे पदसिद्ध सचिव कुलसचिव डॉ. धनराज माने, कायम निमंत्रित परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, सदस्य डॉ. शिवाजी मदन, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. वसंत सानप, डॉ. दत्तात्रय आघाव, संजय निंबाळकर उपस्थित होते.४शासनाने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे; पण त्यासंदर्भात आतापर्यंत विद्यापीठाला लेखी स्वरूपातील मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. ४याबद्दल शासनाने कोणते पाऊल उचलले आहे, ते जाणून घेऊन विद्यापीठातील संपूर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा निर्णय घेतला जाईल, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी उल्हास उढाण यांच्या विषयावर भूमिका स्पष्ट केली.