शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात मोठी ‘लँडबँक’ डीएमआयसीमध्ये

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : देशातील सर्वात मोठी इंडस्ट्रीयल ‘लँडबँक’ दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये असून, आंतरराष्ट्रीय उद्योग या जागेत येणार

औरंगाबाद : देशातील सर्वात मोठी इंडस्ट्रीयल ‘लँडबँक’ दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये असून, आंतरराष्ट्रीय उद्योग या जागेत येणार असल्याने मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी सोमवारी व्यक्त केले.एमआयडीसी (महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ) च्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, सिनेदिग्दर्शक राजदत्त, मुख्य अभियंता केदार नागपुरे, कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी, राहुल तिडके, प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, बाळासाहेब चव्हाण यांची उपस्थिती होती. दांगट म्हणाले, एमआयडीसी शासनाचे भूषण आहे. या महामंडळाची व्याप्ती वाढली आहे. ८५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र या महामंडळाकडे आहे. डीएमआयसीसाठी १० हजार एकर जमीन संपादित करून दिली. परदेशी गुंतवणूक होईलच, शिवाय स्थानिक उद्योगांनादेखील मोठ्या प्रमाणात संधी तेथे मिळेल. जमीन, दळणवळण, पाणी, वीज आणि कुशल मनुष्यबळामुळे हा विभाग समृद्धीकडे जाणार आहे. परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. महसूल, पोलीस, महावितरण, जलसंपदा, कृषी आणि एमआयडीसीने एकत्रितपणे काम केल्यास एकात्मिक विकासाचा मार्ग निर्माण होईल. सिनेदिग्दर्शक राजदत्त म्हणाले, व्यक्तीचा आणि समाजाचा विकास व्हायचा असेल तर उद्योग पाहिजेत. उद्योग स्थिरतेतून व्यक्ती विकास होण्यास मदत होते. मुख्य अभियंता नागपुरे म्हणाले, राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपातळीवर उद्योग विकासासाठी एमआयडीसीची स्थापना झाली आहे. तालुके आणि गावापर्यंत उद्योगवाढीला चालना मिळाली पाहिजे. तालुक्यांपर्यंत एमआयडीसी जावी, तोपर्यंत हे महामंडळ असण्याची गरज आहे. याप्रसंगी एमआयडीसीतील गुणवतं विद्यार्थ्यांचा, २५ वर्षे महामंडळात ज्यांनी सेवा केली, त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना काही कर्मचाऱ्यांनी पाल्यांसाठी एमआयडीसीने भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी केली. अतिक्रमणे हटविणारविशेष पोलीस महानिरीक्षक पाटील म्हणाले, औद्योगिक विकासासाठी स्थैर्य हवे असेल तर कायदा व सुव्यवस्था सुरळीत असणे गरजेचे आहे. उद्योगांना पोलीस संरक्षण त्यासाठी गरजेचे असते. ४उद्योगांना पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. एमआयडीसीला स्वत:च्या उत्पन्नातून निधी उभारावा लागतो. उद्योगांना संरक्षण आणि औद्योगिक आरक्षित जागांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस यंत्रणा एमआयडीसीला मदत करील.