शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीची कामे तपासणीनंतरच पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:52 PM

पाऊस कमी झाल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासूनच पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पाऊस कमी झाल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासूनच पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या़जलसंपदा लघूसिंचन, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे, नांदेड पाटबंधारे दक्षिण, उत्तर विभागाअंतर्गत कोल्हापुरी बंधाºयांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत खोतकर बोलत होते़ जिल्ह्यात आजघडीला १७६ कोल्हापुरी बंधारे असून त्यासाठी १२ हजार ४६५ दरवाजे आहेत़ त्यातील सध्या कार्यरत दरवाजांची संख्या ८ हजार ६७१ असून तब्बल ३ हजार ७९४ दरवाजे अद्यापही नादुरुस्त आहेत़ टंचाई आणि अतिवृष्टीमुळे नुकसान टाळण्यासाठी प्रकल्पाचे दरवाजे उघडता व बंद करता आली पाहिजेत़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या १८ क्रमांकाच्या दरवाजाची व कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या तपासणी करावी़ प्रकल्पातील पाणी वाहून जाणार नाही, याबाबत दक्षता घेवून दुरुस्तीची कामे करावीत़ पुढील पाणीटंचाई लक्षात घेऊन कोल्हापुरी बंधाºयातील साठवलेले पाणी वाहून जाऊ नये यासाठी दक्ष रहावे़ दरवाजाची किरकोळ दुरुस्ती, नादुरुस्त दरवाजा, बांधकाम व इतर दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित विभाग किंवा आमदार निधीतून खर्च करण्यासाठी प्रयत्न करावा़ ज्या विभागाने कोल्हापुरी बंधारे बांधली त्यांनी बंधाºयांची देखभाल पूर्ण करावी़ यासाठी वेळेत दखल घेऊन यंत्रणांनी सतर्क रहावे़ यावेळी बैठकीला आ़ अमरनाथ राजूरकर, आ़हेमंत पाटील, आ़डी़पी़सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, आयुक्त गणेश देशमुख, अधीक्षक अभियंता एसक़े़सबीनवार उपस्थित होते़