शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अकार्यक्षमता झाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

उस्मानाबाद : गत पाच वर्षातील आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर टीका केली आहे़

उस्मानाबाद : गत पाच वर्षातील आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर टीका केली आहे़ शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या नादात काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात दुर्दशा झाली असून, दोन मतदार संघात काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे़ तर चव्हाण यांच्या विरोधात जवळपास ७० टक्के लोकांनी मतदान केले असून, मतविभाजनामुळे ते निवडूण आले आहेत़ अन्यथा त्यांना यावेळी घरी बसावे लागले असते, असा टोमणाही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रत्युत्तरादाखल काढलेल्या पत्रकात मारला आहे़आ़ चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या़ चव्हाण यांच्या आरोपांचे खंडण करीत बिराजदार यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले, तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे उजनी पाणीपुरवठा योजना व २५ टीएमसी पाणी योजनेस मंजुरी मिळाली आहे़ मंत्रीमंडळात ज्येष्ठ नेते असलेले मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे असताना रेटा लावून धरला असता तर २५ टीएमसी पाण्याची योजना पूर्णत्वास आली असती़ मात्र, योजनेच्या किंमतीत दरवर्षी वाढ होत होती़ तेवढा पैसाही उपलब्ध करून दिला नाही़ आपली कार्यक्षमता लपविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे अर्थ व जलसंधारण खाती असल्यामुळे ही योजना रखडल्याचे सांगत आ़ चव्हाण हे जबाबदारी झटकत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे़जिल्हा बँकेलाही शासकीय मदत मिळवून देण्यासाठी गप्प का राहिलात ? बँकेतील जिल्हा परिषदेची खाती इतरत्र वळविताना आपण गप्प का राहिलात ? असे सवालही उपस्थित केले आहेत़शिवाय तुळजाभवानी कारखान्याबाबत, लोकमंगलला कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत चुकीची विधाने करण्यात आल्याचेही बिराजदार यांनी पत्रकात म्हटले आहे़ तसेच उजनी पाणीपुरवठा योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ६० कोटी दिल्याचे सांगितले जाते़ मात्र, आजपर्यंत पूर्ण रक्कम पालिकेला मिळाली नाही़ उजनी पाणीपुरवठा योजनेमुळे उस्मानाबादकरांचा पाणीप्रश्न मिटला असून, खानापूर येथे पंप हाऊस सुरू झाल्यानंतर शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)