शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

स्वच्छतेची चळवळ गतीमान करणार

By admin | Updated: August 19, 2016 01:00 IST

आशपाक पठाण , लातूर पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक कामाला प्राधान्य देत लातूर जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ गतीमान करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे़

आशपाक पठाण , लातूरपाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक कामाला प्राधान्य देत लातूर जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ गतीमान करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे़ याशिवाय जलयुक्त शिवार, जलपुनर्भरण, गॅबियन बंधारे, भुमीगत बंधाऱ्यांच्या कामातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ माणिक गुरसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़लातूरची जिल्हा परिषद राज्यात नावाजलेली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यासाठी स्वच्छतेच्या कामावर विशेष लक्ष देणार आहे़ गावची जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत परिसर स्वच्छ राहील, यातून लोकांना प्रेरणा देत वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येईल़ घरात शौचालय बांधून प्रमाणपत्र घेणाऱ्यांची संख्या अधिक असते़ त्याचा वापर होत नसेल तर त्या कुटुंबाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, उघड्यावर जाणाऱ्या महिलांची होणारी कुचंबना थांबविण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जाईल़जलपुनर्भरणाच्या कामांना गती देणे, जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढीवर लक्ष दिले जाणार आहे़ राखीपौर्णिमेनिमित्त बहिणीला संरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या भावाने उघड्यावर जाणाऱ्या आपल्या माता भगिनींना यंदाच्या पौर्णिमेला शौचालयाचे बांधकाम करून देत आरोग्याची ओवाळणी द्यावी, असे आवाहन सीईओ गुरसाळ यांनी केले़ कामचुकार कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष देत सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़ मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील डाऊच खुर्द (ता़ कोपरगाव) येथील रहिवासी असलेले डॉ़ माणिक गुरसाळ हे १९९४ साली शासकीय सेवेत दाखल झाले़ उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे़ धुळे, नाशिकच्या विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना तीन महिन्यात गुरसाळ यांनी २४ हजार प्रकरणे निकाली काढली़ धुळे, जळगाव जिल्ह्यात असताना टंचाईत पाणीपुरवठ्याचे मोठी कामगिरी केली़