शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

स्वच्छतेची चळवळ गतीमान करणार

By admin | Updated: August 19, 2016 01:00 IST

आशपाक पठाण , लातूर पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक कामाला प्राधान्य देत लातूर जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ गतीमान करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे़

आशपाक पठाण , लातूरपाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक कामाला प्राधान्य देत लातूर जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ गतीमान करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे़ याशिवाय जलयुक्त शिवार, जलपुनर्भरण, गॅबियन बंधारे, भुमीगत बंधाऱ्यांच्या कामातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ माणिक गुरसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़लातूरची जिल्हा परिषद राज्यात नावाजलेली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यासाठी स्वच्छतेच्या कामावर विशेष लक्ष देणार आहे़ गावची जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत परिसर स्वच्छ राहील, यातून लोकांना प्रेरणा देत वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येईल़ घरात शौचालय बांधून प्रमाणपत्र घेणाऱ्यांची संख्या अधिक असते़ त्याचा वापर होत नसेल तर त्या कुटुंबाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, उघड्यावर जाणाऱ्या महिलांची होणारी कुचंबना थांबविण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जाईल़जलपुनर्भरणाच्या कामांना गती देणे, जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढीवर लक्ष दिले जाणार आहे़ राखीपौर्णिमेनिमित्त बहिणीला संरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या भावाने उघड्यावर जाणाऱ्या आपल्या माता भगिनींना यंदाच्या पौर्णिमेला शौचालयाचे बांधकाम करून देत आरोग्याची ओवाळणी द्यावी, असे आवाहन सीईओ गुरसाळ यांनी केले़ कामचुकार कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष देत सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़ मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील डाऊच खुर्द (ता़ कोपरगाव) येथील रहिवासी असलेले डॉ़ माणिक गुरसाळ हे १९९४ साली शासकीय सेवेत दाखल झाले़ उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे़ धुळे, नाशिकच्या विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना तीन महिन्यात गुरसाळ यांनी २४ हजार प्रकरणे निकाली काढली़ धुळे, जळगाव जिल्ह्यात असताना टंचाईत पाणीपुरवठ्याचे मोठी कामगिरी केली़