शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

खुर्ची टेम्पररी अन् मैत्री पर्मनंट असते, छत्रपती संभाजीनगराने दिलेले प्रेम विसरता येणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भावोत्कट उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:30 IST

सरन्यायाधीश यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या वास्तव्यातील अनेक घटना, घडमोडी व आठवणींना उजाळा दिला.

छत्रपती संभाजीनगर : खुर्ची टेम्पररी अन् नातेसंबंध पर्मनंट असतात. औरंगाबाद खंडपीठाने दिलेले प्रेम विसरता येणार नाही, असे भावोत्कट उद्गार सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गुरुवारी येथे सत्काराला उत्तर देताना काढले.

सरन्यायाधीश यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या वास्तव्यातील अनेक घटना, घडमोडी व आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘आपल्या हृदयात माझ्याविषयी जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम मला नागपूर, अमरावती व याशहराविषयी आहे. मी तुमचाच आहे व तुम्ही माझे आहात. आतापर्यंत जसे प्रेम दिले, तसेच पुढेही देत राहा. देशाची सेवा करण्याचा आशीर्वाद द्या’, अशी सादही त्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहाला घातली. जोडलेले मित्र, कोर्टात अधूनमधून झालेले मतभेदसुद्धा कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी विशद केले. ते म्हणाले, ‘खुर्ची येते व जाते. प्रेम मात्र कायम राहते. मी गेलो तेथे मित्र जोडत गेलो.’

यावेळी त्यांनी ॲड. एस.के. शेळके, ॲड. बनकर पाटील, ॲड. नंदकुमार खंदारे, भरत वर्मा, ॲड. श्रीराम वर्मा, ॲड. अमोल सावंत, ॲड. वसंतराव साळुंके, ज्येष्ठ विधिज्ञ आर.एन. धोर्डे, प्रवीण मंडलिक, व्ही.डी. होन यांच्यासह न्यायमूर्ती तात्यासाहेब ऊर्फ बी.एन. देशमुख यांचा विशेष उल्लेख केला. न्या. के.यू. चांदीवाल, आर.एम. बोर्डे, साधना जाधव, प्रसन्ना वराळे, संभाजी शिंदे, सुनील देशमुख आदी न्यायमूर्तींचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. एवढेच नव्हे, तर सरन्यायाधीशांनी विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षकांचा नामोल्लेखही यावेळी केला. ॲड. नेहा कांबळे सतत चांगले सूत्रसंचालन करते, अशी प्रशंसाही त्यांनी केली. अनेकांची नावे घेत, त्यांचे हसविणारे किस्सेही सांगितले.

...त्याचा मला कायम खेद राहीलसरन्यायाधीश म्हणाले, ‘अनेकदा चांगले काम करूनही संधी मिळेलच, असे नाही. अनेकदा प्रयत्न केले तरी नियती आपल्या बाजूने नसते. न्या. संजय गंगापूरवाला हे सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकले नाहीत. हा सर्वोच्च न्यायालयाचा तोटा आहे व माझी ही खंतही आहे.’

औरंगाबाद खंडपीठात मोठे पोटेन्शिअलमी न्यायमूर्ती झाल्यानंतर येथे जवळपास सहा वर्षे न्यायदान केले. येथील वकिलांमध्ये मोठी क्षमता आहे. या क्षमतेवर अनेकदा संशय व्यक्त झाला; परंतु या खंडपीठाने अनेक न्यायमूर्ती दिले. त्यापैकी चार राज्यांचे मुख्य न्यायमूर्ती झाले. वराळे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असून, तेथे येथील अन्य तीन ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. यामुळे माझी अपेक्षापूर्ती झाली. औरंगाबाद खंडपीठ देशात सतत नाव उंचावेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी नितीन सांबरे, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची समयोचित भाषणे झाली. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बोरूलकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. गीता देशपांडे, ॲड. राजेंद्र गोडबोले, ॲड. श्रीकांत अदवंत, ज्येष्ठ विधिज्ञ बी.आर. कातनेश्वरकर, नंदकुमार खंदारे व आर.एन. धोर्डे, राज्य वकील परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख, मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे व ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सरन्यायाधीशांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वकील संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कवडे व शिल्पा अवचार- शेरखाने, सहसचिव शरद शिंदे व सुस्मिता दौंड, कोषाध्यक्ष राम थोरात, ग्रंथालय समिती अध्यक्ष बळीराम शिंदे व सचिव विश्वेश्वर पठाडे आणि सदस्य अक्षरा मडके, नसीम बानू देशमुख, मयूर बोरसे, कृष्णा भोसले, उमेश गीते, संकेत पळणीटकर, आशुतोष शिसोदिया, राहुल सूर्यवंशी व ओमप्रकाश तोटावाड यांनी प्रयत्न केले. ॲड. रवींद्र गोरे यांनी आभार मानले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय