शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:32 IST

काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर : फळे ही शरीरासाठी आरोग्यदायी असतात; परंतु काही फळे रिकाम्यापोटी खाल्ल्यास काहींना पोटफुगी, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे अशी फळे रिकाम्यापोटी खाणे टाळली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

काही फळे उष्ण; काही आम्लधर्मीकेळी, पपई यासारखी फळे उष्ण असतात. संत्री, मोसंबी, अननस ही आम्लधर्मी फळे आहेत. ही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने काहींना त्रास होऊ शकतो. पपई शरीरातील उष्णता वाढवते. उन्हाळ्यात रिकाम्यापोटी पपई खाल्ल्यास घशाला कोरड पडणे, शरीरात उष्णता वाढणे, पोटात जळजळ होणे, अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात.

रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास....रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास काही जणांमध्ये ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे अपचन, छातीत जळजळ किंवा पित्त वाढल्यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेकांना रिकाम्यापोटी आंबट फळे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

फळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबरफळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबर असते. फळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.

उन्हाळ्यात कोणती फळे खाल?उन्हाळ्यात मोसमी आणि थंड प्रकृतीची फळे खाणे फायदेशीर असते. कलिंगड, खरबूज, सफरचंद, आंबा (मर्यादित प्रमाणात), डाळिंब आदी फळे खाल्ली पाहिजे.

नाश्त्याला फळे खाणे योग्य की अयोग्य?नाश्त्यामध्ये फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते. त्याबरोबर जेवणातही फळांचा समावेश असणे, हे अधिक उपयुक्त ठरते.

फळांमध्ये अँटिऑक्सिडंटफळांमध्ये अँटिऑक्सिडंट असते. शरीराच्या शुद्धीकरणात ते फायदेशीर ठरते. उपाशीपोटी फळे खाल्ली तरी चालतात. प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. उपाशीपोटी फळ खाल्ले तर त्रास होतो, असे नाही. मात्र, एखादे फळ खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असेल तर तो फळामुळे होत असेल.- मंजू मंठाळकर, आहारतज्ज्ञ, घाटी रुग्णालय

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रHealthआरोग्य