शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:32 IST

काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर : फळे ही शरीरासाठी आरोग्यदायी असतात; परंतु काही फळे रिकाम्यापोटी खाल्ल्यास काहींना पोटफुगी, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे अशी फळे रिकाम्यापोटी खाणे टाळली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

काही फळे उष्ण; काही आम्लधर्मीकेळी, पपई यासारखी फळे उष्ण असतात. संत्री, मोसंबी, अननस ही आम्लधर्मी फळे आहेत. ही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने काहींना त्रास होऊ शकतो. पपई शरीरातील उष्णता वाढवते. उन्हाळ्यात रिकाम्यापोटी पपई खाल्ल्यास घशाला कोरड पडणे, शरीरात उष्णता वाढणे, पोटात जळजळ होणे, अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात.

रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास....रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास काही जणांमध्ये ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे अपचन, छातीत जळजळ किंवा पित्त वाढल्यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेकांना रिकाम्यापोटी आंबट फळे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

फळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबरफळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबर असते. फळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.

उन्हाळ्यात कोणती फळे खाल?उन्हाळ्यात मोसमी आणि थंड प्रकृतीची फळे खाणे फायदेशीर असते. कलिंगड, खरबूज, सफरचंद, आंबा (मर्यादित प्रमाणात), डाळिंब आदी फळे खाल्ली पाहिजे.

नाश्त्याला फळे खाणे योग्य की अयोग्य?नाश्त्यामध्ये फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते. त्याबरोबर जेवणातही फळांचा समावेश असणे, हे अधिक उपयुक्त ठरते.

फळांमध्ये अँटिऑक्सिडंटफळांमध्ये अँटिऑक्सिडंट असते. शरीराच्या शुद्धीकरणात ते फायदेशीर ठरते. उपाशीपोटी फळे खाल्ली तरी चालतात. प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. उपाशीपोटी फळ खाल्ले तर त्रास होतो, असे नाही. मात्र, एखादे फळ खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असेल तर तो फळामुळे होत असेल.- मंजू मंठाळकर, आहारतज्ज्ञ, घाटी रुग्णालय

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रHealthआरोग्य