शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:32 IST

काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर : फळे ही शरीरासाठी आरोग्यदायी असतात; परंतु काही फळे रिकाम्यापोटी खाल्ल्यास काहींना पोटफुगी, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे अशी फळे रिकाम्यापोटी खाणे टाळली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

काही फळे उष्ण; काही आम्लधर्मीकेळी, पपई यासारखी फळे उष्ण असतात. संत्री, मोसंबी, अननस ही आम्लधर्मी फळे आहेत. ही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने काहींना त्रास होऊ शकतो. पपई शरीरातील उष्णता वाढवते. उन्हाळ्यात रिकाम्यापोटी पपई खाल्ल्यास घशाला कोरड पडणे, शरीरात उष्णता वाढणे, पोटात जळजळ होणे, अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात.

रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास....रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास काही जणांमध्ये ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे अपचन, छातीत जळजळ किंवा पित्त वाढल्यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेकांना रिकाम्यापोटी आंबट फळे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

फळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबरफळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबर असते. फळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.

उन्हाळ्यात कोणती फळे खाल?उन्हाळ्यात मोसमी आणि थंड प्रकृतीची फळे खाणे फायदेशीर असते. कलिंगड, खरबूज, सफरचंद, आंबा (मर्यादित प्रमाणात), डाळिंब आदी फळे खाल्ली पाहिजे.

नाश्त्याला फळे खाणे योग्य की अयोग्य?नाश्त्यामध्ये फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते. त्याबरोबर जेवणातही फळांचा समावेश असणे, हे अधिक उपयुक्त ठरते.

फळांमध्ये अँटिऑक्सिडंटफळांमध्ये अँटिऑक्सिडंट असते. शरीराच्या शुद्धीकरणात ते फायदेशीर ठरते. उपाशीपोटी फळे खाल्ली तरी चालतात. प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. उपाशीपोटी फळ खाल्ले तर त्रास होतो, असे नाही. मात्र, एखादे फळ खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असेल तर तो फळामुळे होत असेल.- मंजू मंठाळकर, आहारतज्ज्ञ, घाटी रुग्णालय

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रHealthआरोग्य