शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

भाजपकडून घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू : जिग्नेश मेवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 8:13 PM

संविधान वाचविण्यासाठी भाजपला रोखा

ठळक मुद्देआंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता

औरंगाबाद : हळूहळू घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवायचे असेल, तर मतदानाच्या ताकदीतून आरएसएस आणि भाजपला रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी विखुरलेल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जिग्नेश मेवानी यांनी केले. 

संविधान सन्मान यात्रा औरंगाबादेत आल्यावर ते आयोजित सभेला संबोधित करीत होते. रिपाइं नेते तथा जि.प. सदस्य रमेश गायकवाड अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रल्हाद लुुलेकर, निवृत्ती सांगवे, डॉ. सुशील गौतम, नगरसेवक रवी सोनकांबळे, अशोक पगार आदींची उपस्थिती होती. 

आ. मेवानी पुढे म्हणाले की, दुष्काळ व महापुराच्या खाईत मराठवाड्याला ढकलून त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत जनतेच्या पैशावर महाजनादेश यात्रा काढणाऱ्या मुख्यमंत्र्याला जनतेचे काही देणे घेणे नाही. याचा जाब जनतेने विचारायला हवा. मुस्कटदाबीचे राजकारण जनतेला समजू लागले आहे. गुजरातचा दलित आणि महाराष्ट्राच्या दलिताच्या जोडीला हिंमत देण्यासाठी आला आहे. नामांतर चळवळीत औरंगाबादचे नाव सर्वांना परिचित आहे. दलित क्रांतीचे बीज या शहरातूनच निर्माण झाले आहे. नवीन नेतृत्व विकाऊ नव्हे तर टिकाऊ तयार करण्याची जबाबदारी सामान्य जनतेत आहे. आंबेडकरी जनतेने सर्वांना सोबत घेऊनच राजकीय लढाई लढायची असून, त्यासाठी तुमची सर्वांची साथ आवश्यक आहे. म्हणून संविधान सन्मान यात्रा काढावी लागत आहे. 

प्रा. लुलेकर यांनी घटनेच्या बाजू कमकुवत करणाऱ्या जातीयवादी संघटनेचे डाव आता तरी तुम्ही ओळखा असा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोप करताना रमेश गायकवाड यांनी समाजाची होत असलेली वाताहत टाळण्यासाठी ईव्हीएम मशीन बंद करून मतदान घेण्यासाठी पेटून उठावे लागेल, असे सांगितले. 

यावेळी कडूबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक भीमगीताला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर संयोजकांनी खरात यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप पगारे व प्रमोद मगरे यांनी केले. यशस्वीतेसाठी संयोजकांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रात युवकांनी जागरूक व्हावेशिक्षण ही विकासाची जननी असून, सध्या सोशय मीडियावर टाकण्यात येणाऱ्या पोस्ट अगदी विचारपूर्वक आवश्यकता असेल तरच पुढे टाकाव्यात. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या नाहक आणि व्यर्थ पोस्टला टाकू नये, याविषयी सतत जागरूक असले पाहिजे.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद