शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

गाड्यांचा धुरळा उडवत गोण्यांतून वाटले करोडो रुपये, ५०० कोटींचा 'थर्टी-30' घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 8:00 AM

औरंगाबादेत ३०:३० गुंतवणूक घोटाळा : १ लाख रुपयास ७ ते २५ हजार रुपयांपर्यंत दिलेल्या परताव्याला भुलले शेतकरी; आरोपी म्हणतो, ७० कोटीच घेतले

राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या ३०:३० गुंतवणूक घोटाळ्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांना १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ७ ते २५ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना फसविण्यात आले आहे.

पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव, बोकूड जळगाव तांडे, पाटोदे वडगाव, चिंचोली, जांभळी, निलसगाव, जांभळी तांडा, यासह इतर गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी पैशाच्या आमिषापोटी घोटाळ्याचा मास्टरमाइंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड, त्याचा नातेवाईक साथीदार पंकज शेषराव चव्हाण यांच्याकडे कोट्यवधी रुपये जमा केले. हा घोटाळा ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा असून, आरोपीने ६० ते ७० कोटी रुपये मिळाल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील रहिवासी संतोष राठोड याने ३० एप्रिल २०१३ रोजी १ लाख रुपयांच्या बदल्यात ५ ते ७ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याची योजना सुरू केली होती. योजनेत पहिले तीन महिने परतावा मिळत नसे. चौथ्या महिन्यापासून ठरलेली रक्कम देण्यास सुरुवात केली जात होती. या योजनेतून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा होऊ लागले. त्याने गाडीचा नंबर ३०३०, मोबाइलच्या क्रमांकाचे शेवटचे अंक ३०३० असेच घेतले. त्याच्या एजंटांनीही स्वत:च्या गाड्या, मोबाइल क्रमांकाच्या शेवटी ३०३० नंबर घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे राठोडच्या योजनेला ३०:३० नावानेच ओळखले जाऊ लागले. 

ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांच्या परताव्याचे पैसे देण्यासाठी संतोष राठोड आलिशान गाड्यांचा ताफा घेऊनच गावात जात होता. त्यातून शेतकऱ्यांचा विश्वास बसू लागला होता. डीएमआयसी प्रकल्पाच्या भूसंपादनापोटी मिळालेल्या पैशांतून लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या योजनेत केली.   

असा झाला फुगवटाnमार्च-एप्रिल २०२१ मध्ये थकीत परतावा दिला. तेव्हा ज्यांनी दहा लाख रुपये गुंतवणूक केली, त्यांना अडीच लाख रुपये मिळाले होते. nएजंटांनी परताव्याचे पैसे दिल्यानंतर शेतकरी ते पैसे मूळ रकमेत जमा करण्यास सांगत. त्यामुळे एका महिन्यातच १० लाखांचे साडेबारा लाख रुपये व्हायचे.nत्यातून या घोटाळ्याची व्याप्ती ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

असे फुटले बिंगफेब्रुवारी २०२१मध्ये या घोटाळ्याविषयी वृत्त बाहेर आले. त्यानंतर आरोपी संतोष राठोडने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये परतावा दिला. त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली, मात्र परतावा काही मिळाला नाही. त्यामुळे ज्योती ढोबळे या महिलेने बिडकीन ठाण्यात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी तक्रार दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याने राठोडला जामीन मिळाला. यानंतर २१ जानेवारी २०२२ रोजी दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याची दुसरी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष राठोड यास बेड्या ठोकल्या गेल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस