शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

बीड बायपासचे काम नव्या वर्षात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 13:30 IST

बीड बायपासच्या रुंदीकरणाचा, सर्व्हिस रोडचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेत बीड बायपास रुंदीकरणावरून चार वर्षे टोलवा-टोलवी आॅक्टोबरच्या आत निविदा काढण्याचा विचार आहे.

औरंगाबाद : सातारा-देवळाईसह शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा असलेल्या बीड बायपासच्या रुंदीकरणाचा, सर्व्हिस रोडचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. राज्याच्या बजेटमध्ये बायपाससाठी ३८३ कोटींची तरतूद केल्याचे शीर्षक तयार झाले आहे. आॅक्टोबर २०१९ पर्यंत डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करून निविदा अंतिम करण्यासाठी बांधकाम विभागाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नव्या वर्षात रस्त्याचे काम सुरु होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे काम पूर्ण होताच महानुभव आश्रम ते झाल्टा फाट्यापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणातून ३० मीटरपर्यंत बांधकाम विभागाच्या अखत्यारीत जेवढी जागा आहे, तेवढा रस्ता रुंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने २ जून रोजी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी १०३ कोटी रुपयांची संचिका मंजूर केल्यानंतर मंत्रालयात सचिव पातळीवर विचारमंथन होऊन ३८३ कोटींची तरतूद बजेटमध्ये (अर्थसंकल्प) करण्यात आली आहे. मनपाची रस्ता करण्याची क्षमता नाही, भूसंपादन करणे मनपाच्या आवाक्यात नाही. त्यामुळे ३० मीटर रुंद जागेत जेवढा रस्ता होईल, तेवढा करण्याचा प्रस्ताव बांधकाममंत्र्यांसमोर ठेवला होता. १०३ कोटींचा प्रस्ताव बांधकाममंत्र्यांनी मंजूर केला; परंतु चार दिवसांनी बांधकाममंत्र्यांनी ३८३ कोटी रुपयांतून रस्ता करण्यात येणार असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला सांगितले. नेमका किती कोटींतून हा रस्ता होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता; परंतु राज्याच्या बजेटमध्ये गेल्या आठवड्यात त्या रस्त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ, एनएचएआय या दोन्ही संस्थांनी रस्त्याच्या कामाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेत बीड बायपास रुंदीकरणावरून चार वर्षे टोलवा-टोलवी झाली. परिणामी, त्या मार्गावर रोज अपघातांचे तांडव सुरू आहे. अपघाती मृत्यूचे हे तांडव रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर थांबणे शक्य आहे. 

एनएचएआयचा डीपीआर होता ३८९ कोटींचा नॅशनल हायचे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) बायपाससाठी ३८९ कोटींचा डीपीआर तयार केला होता. त्यात तीन उड्डाणपूल व भुयारी मार्गांसह काँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचा समावेश होता. राज्य शासनाने ३८३ कोटी अनुदान निश्चित केल्यामुळे भुयारी मार्ग, उड्डाणपुलांसह डीपीआर बांधकाम विभागाने तयार करण्यावर भर देणार की फक्त सर्व्हिस रोडसह रुंदीकरण करणार, असा प्रश्न आहे. एनएचएआयचा डीपीआर जर बांधकाम विभागाने स्वीकारला, तर काही महिन्यांचा काळ वाचेल.

मुख्य अभियंत्यांची माहिती अशीबांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के.टी. पाटील यांनी सांगितले, ३८३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता डीपीआर तयार करणार आहोत. ३० मीटर जागेत जेवढा रस्ता बसेल तेवढा रुंद करण्याचा विचार आहे. मनपाला सर्व्हिस रोडसाठी दोन्ही बाजूंनी १५ मीटर भूसंपादन करावे लागेल. २ ते ३ महिन्यांत डीपीआर तयार होईल. तो डीपीआर विभागीय आयुक्तालयात मनपा व इतर यंत्रणांसमोर मांडू. सर्वांच्या सहमतीने डीपीआरला मंजुरी मिळाल्यास पुढे जाता होईल. आॅक्टोबरच्या आत निविदा काढण्याचा विचार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादAccidentअपघात