शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

औरंगाबादमध्ये कोजागरीच्या ‘सेलिब्रेशन’ची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 7:46 PM

दसरा-दिवाळीप्रमाणेच आता कोजागरीनिमित्त घरोघरी ‘सेलिबे्रशन’ होत असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दूध आणि सुकामेव्याची बाजारपेठही सरसावली आहे.

औरंगाबाद : दसरा झाल्यानंतर वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून, कोजागरीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गाण्यांच्या मैफली आयोजित करून आपल्या आप्तस्वकीयांसह रात्री जागरण करून सुकामेवा घालून आटविण्यात आलेले दूध प्राशन करण्याचीही अनेक ठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. दसरा-दिवाळीप्रमाणेच आता कोजागरीनिमित्त घरोघरी ‘सेलिबे्रशन’ होत असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दूध आणि सुकामेव्याची बाजारपेठही सरसावली आहे.

दूध महासंघ आणि परराज्यातून  येणारे दूध मिळून शहरात दररोज दोन ते सव्वादोन लाख लिटर दुधाची विक्री होते, कोजागरीनिमित्त तीन लाख लिटर दूध येणार असल्याचे सांगण्यात आले. दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक पी. बी. पाटील म्हणाले की, दररोज दूध महासंघातर्फे  शहरात पन्नास हजार लिटर दूध पुरविले  जाते. मागच्या वर्षी कोजागरीच्या दिवशी तीस हजार लिटर जास्तीचे दूध मागवले गेले होते. यावर्षी चाळीस हजार लिटर अतिरिक्त दूध येणार आहे.

दर महिन्यात सुकामेव्याच्या होणाऱ्या विक्रीपेक्षा कोजागरीनिमित्त होणारी विक्री ५० टक्क्यांनी अधिक असते; परंतु यंदा त्यावर दुष्काळाची छाया आहे, असे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले. चारोळी, काजू, बदाम, के शर, पिस्ता या सुकामेव्याला यानिमित्त जास्त मागणी असते. मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथील चारोळी, गोवा आणि दक्षिण भारतातून आलेले काजू, अमेरिकेहून आलेले बदाम, क ाश्मीरहून आलेले के शर आणि इराण-अमेरिकेवरून आलेले पिस्ते औरंगाबादकरांचे दूध आणखी स्वादिष्ट करणार आहेत. 

दुष्काळाचा परिणामदरवर्षीपेक्षा यावर्षी १०-२० टक्क्यांनी सुकामेव्याची मागणी घटली. हा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम असल्याचे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले.अश्विनी पौर्णिमेला लक्ष्मी देवी घराघरामध्ये फिरून ‘को-जागरी’ असे म्हणत कोण जागरण करीत आहे, हे पाहत असते. त्यामुळेच या पौर्णिमेला ‘कोजागरी’ म्हणून ओळखले जाते. ज्या व्यक्ती जागरण करतात, त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते, अशी दंतकथा याविषयी सांगितली जाते. 

खगोलीय दृष्टिकोनातून कोजागरीचे महत्त्व२७ नक्षत्रांपैकी सर्वात पहिले नक्षत्र म्हणजे अश्विनी. तसेच अश्विनी पौर्णिमेनंतर हिवाळा सुरू होतो. दिवसा तापमान कमी आणि रात्री जरासे उबदार वातावरण या दिवसांत जाणवते. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ येऊन मोठा दिसतो. त्यामुळे सर्वत्र टिपूर चांदणे आणि चंद्राचा दुधाळ प्रकाश पडलेला असतो. हा क्षण साजरा करण्यासाठी कोजागरीची सुरुवात झाली असावी, असे शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkojagariकोजागिरीmilkदूध