शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विभागाची सात वर्षांतील सर्वात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:07 IST

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागाने निकालात सात वर्षांतील नीचांकी ...

ठळक मुद्देदहावीचा निकाल : बीड जिल्हा विभागात प्रथम; मुलींची बाजी कायम; मागील वर्षाच्या तुलनेत १३.६१ टक्क्यांनी घसरण

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागाने निकालात सात वर्षांतील नीचांकी पातळी गाठली. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १३.६१ टक्क्यांनी निकाल घसरून ७५.२० टक्के लागला. विभागात बीड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८१.२३ टक्के लागल. सर्वात कमी निकाल हिंगोली जिल्ह्याचा आहे. या निकालात प्रतिवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली.शिक्षण मंडळाने १ ते २२ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) दुपारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यानंतर विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषद घेत निकालाची वैशिष्ट्ये सांगितली. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण, मंडळाचे सहसचिव विजय जोशी यांची उपस्थिती होती. यावर्षी विभागांतर्गत २ हजार ५१८ शाळांमधील १ लाख ८६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १ लाख ८३ हजार २२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३७ हजार ७८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाचा निकाल मार्च २०१३ नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक घसरला आहे. २०१३ मध्ये ८१.१८ टक्के, २०१४ मध्ये ८७.०६, २०१५ मध्ये ९०.५७, २०१६ मध्ये ८८.०५, २०१७ मध्ये ८८.१५, २०१८ मध्ये ८८.८१ टक्के निकालाची नोंद झाली आहे. यावर्षी १३.६१ टक्क्यांनी घसरण होत ७५.२० टक्के निकाल लागला आहे. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये बीड जिल्हा प्रथमस्थानी असून, त्याचा निकाल ८१.२३ टक्के आहे. यानंतर औरंगाबाद ७७.२९, जालना ७६.१४, परभणी ६६.३५ आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ६४.५३ टक्के आहे. विभागाच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८२.२५ आणि मुलांची ६९.५८ टक्के एवढी असल्याचे सुगता पुन्ने यांनी सांगितले. दहावीच्या परीक्षेत विभागात एकूण गैरप्रकार २०८ झाले आहेत. त्या सर्व प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, ४ विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली. २०२ विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करीत पुढील एका परीक्षेला प्रतिबंध आणि २ विद्यार्थ्यांना पुढील पाच परीक्षेला प्रतिबंध घालण्यात आला.क्रीडा, चित्रकलेचे हजारो विद्यार्थ्यांना गुणऔरंगाबाद विभागात क्रीडा, एनसीसी आणि चित्रकला स्पर्धेत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग, विशेष प्रावीण्य दाखविलेल्या तब्बल १२ हजार ४७५ विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले.यात सर्वाधिक विद्यार्थी हे चित्रकलेचे आहेत. त्यांची संख्या ११ हजार ३४ एवढी असल्याची माहिती सुगता पुन्ने यांनी दिली.परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम बदलल्यामुळे निकाल घसरलायावर्षी दहावीचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पद्धती बदलण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाच्या नावाखाली शाळेकडून होणारी गुणांची खैरातही थांबविण्यात आली. भाषा विषयासह सामाजिक शास्त्रातील प्रतिविषयांना देण्यात येणारे अंतर्गत २० गुण बंद करण्यात आले होते, तसेच यावर्षी प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुलांना घोकंपट्टी, पाहून प्रश्न लिहिणे यावर निर्बंध आले होते. ज्ञानरचनावाद स्वीकारल्यामुळे विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांच्या वर्गातील शिकविलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर २० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते. अशा वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळेच दहावीचा निकाल घसरला असल्याचे मत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले, तसेच विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले तीच खरी गुणवत्ता आहे. कमी टक्केवारीमुळे निराश होण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस