शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

बोंडअळी नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्ह्याला हवेत २०९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:57 IST

जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानभरपाईसाठी २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३ लाख ८२ हजार २४० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली होती.पूर्वीच्या पंचनाम्यानुसार २७० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव होता.तो दुरुस्तीसह पाठविण्यात आला असून, आता २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांची नुकसानभरपाईसाठी गरज आहे.

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानभरपाईसाठी २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३ लाख ८२ हजार २४० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली होती. त्यांना बोंडअळीमुळे फटका बसला आहे. ३ लाख १४ हजार ८०३ हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली होती.

पूर्वीच्या पंचनाम्यानुसार २७० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव होता. तो दुरुस्तीसह पाठविण्यात आला असून, आता २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांची नुकसानभरपाईसाठी गरज आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या ३ लाख ७३ हजार १२२ इतकी आहे. त्या शेतकर्‍यांचे ३ लाख १४ हजार ८०३ हेक्टरवरील कापसाचे पीक वाया गेले आहे. या शेतकर्‍यांना १६६ कोटी ५६ लाख ८५ हजार ९०८ रुपये भरपाईसाठी लागतील, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ४२ कोटी ८६ लाख ४४ हजार ८०० रुपये लागतील, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे दिला आहे. 

या तालुक्यांतील पिकाचे नुकसानऔरंगाबाद शहर परिसरातील औरंगाबाद, भावसिंगपुरा, उस्मानपुरा, कांचनवाडीतील २,७३० शेतकर्‍यांनी लावलेल्या कापसाच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले. तालुक्यातील चौका, करमाड, लाडसावंगी, हर्सूल, चित्तेपिंपळगाव, चिकलठाणा येथील ५४ हजार ८०३, पैठण तालुक्यातील आडूळ, बालानगर, बिडकीन, लोहगाव, पाचोड, पैठण, विहामांडवा, ढोरकीन, पिंपळवाडी, नांदर येथील ७६ हजार ३१७ शेतकर्‍यांचे, तर लाडगाव, लासूरगाव, शिऊर, बोरसर, नागमठाण, लोणी खु., तुर्काबाद, गंगापूर, हर्सूल, मांजरी, शेंदुरवादा, वाळूज, सिद्धनाथ वडगाव, भेंडाळा, डोणगाव या गंगापूर तालुक्यातील ९ हजार २३ शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. खुलताबाद तालुक्यातील सावंगी, सुलतानपूर, वेरूळ येथील २५ हजार १२९, कन्नड तालुक्यातील चापानेर, चिकलठाण, नाचनवेल येथील ३० हजार ६१७, तर सोयगाव तालुक्यातील बनोटी, सोयगाव, सावळदबारा येथील २६ हजार ७९१ शेतकर्‍यांच्या कापसाचे पीक बोंडअळीमुळे वाया गेले. 

टॅग्स :cottonकापूसAurangabadऔरंगाबाद