शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

बोंडअळी नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्ह्याला हवेत २०९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:57 IST

जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानभरपाईसाठी २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३ लाख ८२ हजार २४० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली होती.पूर्वीच्या पंचनाम्यानुसार २७० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव होता.तो दुरुस्तीसह पाठविण्यात आला असून, आता २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांची नुकसानभरपाईसाठी गरज आहे.

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानभरपाईसाठी २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३ लाख ८२ हजार २४० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली होती. त्यांना बोंडअळीमुळे फटका बसला आहे. ३ लाख १४ हजार ८०३ हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली होती.

पूर्वीच्या पंचनाम्यानुसार २७० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव होता. तो दुरुस्तीसह पाठविण्यात आला असून, आता २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांची नुकसानभरपाईसाठी गरज आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या ३ लाख ७३ हजार १२२ इतकी आहे. त्या शेतकर्‍यांचे ३ लाख १४ हजार ८०३ हेक्टरवरील कापसाचे पीक वाया गेले आहे. या शेतकर्‍यांना १६६ कोटी ५६ लाख ८५ हजार ९०८ रुपये भरपाईसाठी लागतील, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ४२ कोटी ८६ लाख ४४ हजार ८०० रुपये लागतील, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे दिला आहे. 

या तालुक्यांतील पिकाचे नुकसानऔरंगाबाद शहर परिसरातील औरंगाबाद, भावसिंगपुरा, उस्मानपुरा, कांचनवाडीतील २,७३० शेतकर्‍यांनी लावलेल्या कापसाच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले. तालुक्यातील चौका, करमाड, लाडसावंगी, हर्सूल, चित्तेपिंपळगाव, चिकलठाणा येथील ५४ हजार ८०३, पैठण तालुक्यातील आडूळ, बालानगर, बिडकीन, लोहगाव, पाचोड, पैठण, विहामांडवा, ढोरकीन, पिंपळवाडी, नांदर येथील ७६ हजार ३१७ शेतकर्‍यांचे, तर लाडगाव, लासूरगाव, शिऊर, बोरसर, नागमठाण, लोणी खु., तुर्काबाद, गंगापूर, हर्सूल, मांजरी, शेंदुरवादा, वाळूज, सिद्धनाथ वडगाव, भेंडाळा, डोणगाव या गंगापूर तालुक्यातील ९ हजार २३ शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. खुलताबाद तालुक्यातील सावंगी, सुलतानपूर, वेरूळ येथील २५ हजार १२९, कन्नड तालुक्यातील चापानेर, चिकलठाण, नाचनवेल येथील ३० हजार ६१७, तर सोयगाव तालुक्यातील बनोटी, सोयगाव, सावळदबारा येथील २६ हजार ७९१ शेतकर्‍यांच्या कापसाचे पीक बोंडअळीमुळे वाया गेले. 

टॅग्स :cottonकापूसAurangabadऔरंगाबाद