शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

औरंगाबाद महापालिकेवर प्रशासक नेमा; उद्योजक-व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 16:47 IST

विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून धडाकेबाज कामाची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांचे हात मोकळे करणे आवश्यक असल्याचे मत उद्योजक, व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआर्थिक शिस्त, शहरासाठी कठोर निर्णय घ्याप्रशासक नेमणे हा एकमेव उपाय

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद महापालिकेवर किमान १ वर्षासाठी प्रशासक नेमावा, अशी मागणी आज शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांनी केली आहे. महापालिकेतील आर्थिक शिस्त जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत प्रशासक असायला हवा. शहराच्या हितासाठी राजकीय मंडळींना कठोर निर्णय घेता येत नाहीत. लहान मोठ्या सर्जरी केल्याशिवाय शहर सुधारणार नाही. प्रशासक नेमणे हा एकमेव उपाय त्यावर असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने नवी मुंबई महापालिकेसाठी १ फेब्रुवारी रोजी सोडत घेण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद महापालिकेच्या सोडतीचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. राज्य शासन औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. २० एप्रिल २०२० रोजी विद्यमान ११५ नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर नियमानुसार किमान ६ महिने शासनाला मनपावर प्रशासक नेमता येऊ शकतो. त्यासाठी राज्य शासनाला मनपाची आर्थिक शिस्त ही सबब पुरेशी आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरात सहा महिन्यांसाठी निवडणूक लांबणीवर टाकण्याची चर्चाही वेग धरू लागली आहे. यासंदर्भात शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांचे मत ‘लोकमत’ने जाणून घेतले. शेंद्रा एमआयडीसी, डीएमआयसीमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे असेल तर औरंगाबाद शहर बदलायला हवे, असे मत उद्योजकांचे आहे. व्यापाऱ्यांनाही जुन्या शहरातील अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी, पार्किंगसाठी जागेचा अभाव, फेरीवाल्यांचा मुक्तसंचार आदी बाबी त्रासदायक ठरत आहेत. यासंदर्भात मनपा सत्ताधारी, प्रशासन ठोस निर्णय घेत नाही. कोणताही ठोस निर्णय घेताना राजकीय मंडळींना मतदार आठवतात. त्यामुळे ते शहराची कोणतीही सर्जरी करण्यास पुढे येत नाहीत. तत्कालीन मनपा आयुक्त कृष्णा भोगे, त्यानंतर दिलीप बंड, अलीकडेच डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आपल्या कामांचा ठसा उमटविला होता. विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडूनही अशाच पद्धतीच्या कामाची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांचे हात मोकळे करणे आवश्यक असल्याचे मत उद्योजक, व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

प्रशासकाशिवाय पर्याय नाहीमहापालिकेची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. विद्यमान आयुक्तांनी काहीअंशी आर्थिक स्थितीत सुधारणा आणली आहे. त्यांना कठोर निर्णय घेण्यासाठी मोकळीक हवी. शहराच्या सुधारणेसाठी काही कटू निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. राज्य शासनाने निवडणुका घेण्याची घाई न करता किमान १ वर्ष मनपावर प्रशासक नेमावा. विविध विकासकामे केल्यानंतर निवडणुका घ्याव्यात.- मानसिंग पवार, उद्योजक

गो. रा. खैरनार यांच्यासारखे काम हवेमहापालिकेतील वातावरण बरेच दूषित झाले आहे. चांगला व्यक्तीही निवडून गेल्यावर तेथील वातावरणाने चुकीच्या मार्गाला लागतो. कडक प्रशासक एक वर्षासाठी नेमणे हाच एकमेव उपाय आहे. नागपूर शहराचा कायापालट तत्कालीन आयुक्त गो. रा. खैरनार यांनी केला. त्याचप्रमाणे शहराचा कायापालट विद्यमान आयुक्त करू शकतात. नागरिकांनाही महापालिकेचे महत्त्व त्यानंतर कळेल. वर्षभरानंतर होणाऱ्या निवडणुकीत चांगल्या लोकांना मतदार निवडून देतील.- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार