शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

औरंगाबाद महापालिकेवर प्रशासक नेमा; उद्योजक-व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 16:47 IST

विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून धडाकेबाज कामाची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांचे हात मोकळे करणे आवश्यक असल्याचे मत उद्योजक, व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआर्थिक शिस्त, शहरासाठी कठोर निर्णय घ्याप्रशासक नेमणे हा एकमेव उपाय

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद महापालिकेवर किमान १ वर्षासाठी प्रशासक नेमावा, अशी मागणी आज शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांनी केली आहे. महापालिकेतील आर्थिक शिस्त जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत प्रशासक असायला हवा. शहराच्या हितासाठी राजकीय मंडळींना कठोर निर्णय घेता येत नाहीत. लहान मोठ्या सर्जरी केल्याशिवाय शहर सुधारणार नाही. प्रशासक नेमणे हा एकमेव उपाय त्यावर असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने नवी मुंबई महापालिकेसाठी १ फेब्रुवारी रोजी सोडत घेण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद महापालिकेच्या सोडतीचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. राज्य शासन औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. २० एप्रिल २०२० रोजी विद्यमान ११५ नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर नियमानुसार किमान ६ महिने शासनाला मनपावर प्रशासक नेमता येऊ शकतो. त्यासाठी राज्य शासनाला मनपाची आर्थिक शिस्त ही सबब पुरेशी आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरात सहा महिन्यांसाठी निवडणूक लांबणीवर टाकण्याची चर्चाही वेग धरू लागली आहे. यासंदर्भात शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांचे मत ‘लोकमत’ने जाणून घेतले. शेंद्रा एमआयडीसी, डीएमआयसीमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे असेल तर औरंगाबाद शहर बदलायला हवे, असे मत उद्योजकांचे आहे. व्यापाऱ्यांनाही जुन्या शहरातील अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी, पार्किंगसाठी जागेचा अभाव, फेरीवाल्यांचा मुक्तसंचार आदी बाबी त्रासदायक ठरत आहेत. यासंदर्भात मनपा सत्ताधारी, प्रशासन ठोस निर्णय घेत नाही. कोणताही ठोस निर्णय घेताना राजकीय मंडळींना मतदार आठवतात. त्यामुळे ते शहराची कोणतीही सर्जरी करण्यास पुढे येत नाहीत. तत्कालीन मनपा आयुक्त कृष्णा भोगे, त्यानंतर दिलीप बंड, अलीकडेच डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आपल्या कामांचा ठसा उमटविला होता. विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडूनही अशाच पद्धतीच्या कामाची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांचे हात मोकळे करणे आवश्यक असल्याचे मत उद्योजक, व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

प्रशासकाशिवाय पर्याय नाहीमहापालिकेची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. विद्यमान आयुक्तांनी काहीअंशी आर्थिक स्थितीत सुधारणा आणली आहे. त्यांना कठोर निर्णय घेण्यासाठी मोकळीक हवी. शहराच्या सुधारणेसाठी काही कटू निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. राज्य शासनाने निवडणुका घेण्याची घाई न करता किमान १ वर्ष मनपावर प्रशासक नेमावा. विविध विकासकामे केल्यानंतर निवडणुका घ्याव्यात.- मानसिंग पवार, उद्योजक

गो. रा. खैरनार यांच्यासारखे काम हवेमहापालिकेतील वातावरण बरेच दूषित झाले आहे. चांगला व्यक्तीही निवडून गेल्यावर तेथील वातावरणाने चुकीच्या मार्गाला लागतो. कडक प्रशासक एक वर्षासाठी नेमणे हाच एकमेव उपाय आहे. नागपूर शहराचा कायापालट तत्कालीन आयुक्त गो. रा. खैरनार यांनी केला. त्याचप्रमाणे शहराचा कायापालट विद्यमान आयुक्त करू शकतात. नागरिकांनाही महापालिकेचे महत्त्व त्यानंतर कळेल. वर्षभरानंतर होणाऱ्या निवडणुकीत चांगल्या लोकांना मतदार निवडून देतील.- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार