शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबडचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला...

By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST

अंबड : शहराचे पाणी पुन्हा एकदा पेटु लागले आहे. शहरास अवघे काही दिवस पुरेल एवढाच जलसाठा अंबड पालिकेकडे शिल्लक असून जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून

अंबड : शहराचे पाणी पुन्हा एकदा पेटु लागले आहे. शहरास अवघे काही दिवस पुरेल एवढाच जलसाठा अंबड पालिकेकडे शिल्लक असून जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून ३१ आॅक्टोबरपर्यंत अंबड शहरास पाणीपुरवठा सुरु न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा अंबडच्या नगराध्यक्षा मंगल कटारे यांनी विभागीय आयुक्तांना निवेदनाव्दारे दिला आहे. तर त्याच्या प्रत्युत्तरात जालना नगरपालिकेत सत्ता असलेल्या काँगे्रसचे माजी आ.कैलास गोरंटयाल यांनी अंबड पालिकेने १५ कोटी रुपये भरल्याशिवाय अंबडला कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडणार नसल्याची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली. साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी गोरंट्याल यांनी अशीच भूमिका घेतल्यानंतर तत्कालिन आमदार संतोष सांबरे यांनी अंबड शहराचा जायकवाडी-जालना परियोजनेत समावेश करण्याच्या मागणीसाठी जल आंदोलन उभारले होते. त्यावेळी आंदोलनामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. आज या घडामोडी घडत असताना सर्व शहरवासीयांचे लक्ष बदनापूरचे नवनिर्वाचित आ. नारायण कुचे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. सांबरे यांच्या कारकीर्दीत अधुरे राहिलेले जलआंदोलन नारायण कुचे पूर्ण करणार का याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.शहराची एकुण लोकसंख्या ३१ हजार ५३१ आहे. शहरवासीयांची दररोजची पाण्याची गरज आजघडीला दीड ते दोन एमएलडी एवढी आहे. जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजनेची क्षमता ६५ एमएलडी असून योजनेतून सध्या दोन एमएलडी व भविष्यकाळात पाच एमएलडी पाणी देण्याची अंबडवासीयांची जुनी मागणी आहे. विशेष म्हणजे जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्राची भव्य इमारत शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी आहे. दररोज या वाहिनीतून लाखो लिटर पाण्याचा पुरवठा जालना शहरास होत असल्याचे माहित असल्याने दिवसेंदिवस अंबडवासीयांची पाण्याची मागणी जोर धरत आहे. मागील वर्षी जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर जुनी शहागड-अंबड-जालना योजनेतून जालना शहरास मिळणारे पाणी बंद करण्यात आले. मात्र अंबड शहराचा जायकवाडी-जालना योजनेत समावेश न केल्यामुळे आजही अंबड शहरातील जनता कालबाह्य झालेल्या शहागड-अंबड पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. कालबाह्य झालेल्या या योजनेच्या डागडुजी तसेच इतर खर्च अंबड पालिकेस झेपत नसल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे.अंबड शहरास केवळ ३१ आॅक्टोबर पर्यंत पुरु शकेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. ३१ आॅक्टोबर पर्यंत अंबड शहराचा जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत समावेश न केल्यास आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा सोमवारी अंबड पालिकेच्या नगराध्यक्षा मंगल कटारे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.खुद्द नगराध्यक्षांना विभागीय आयुक्तांना भेटून पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी आमरण उपोषणाचा इशारा द्यावा लागत असल्याने शहराच्या गंभीर पाणी संकटाची दाहकता सर्वांना जाणवू लागली आहे.दुसरीकडे जालना पालिकेचे सर्वेसर्वा माजी आ.कैलास गोरंटयाल यांनी १५ कोटी रुपये भरल्याशिवाय पाणी न देण्याची भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली आहे, हे विशेष . (वार्ताहर)