शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

निम्या पावसाळ्यानंतरही तलाव कोरडेठाक

By admin | Updated: July 31, 2014 00:44 IST

तामलवाडी : पावसाळ्यातील दोन महिन्याचा कालावधी संपला तरी तामलवाडी परिसरात अद्याप मोठा पाऊस झाला नाही

तामलवाडी : पावसाळ्यातील दोन महिन्याचा कालावधी संपला तरी तामलवाडी परिसरात अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील साठवण पाझर तलाव, नाले अद्याप कोरडेठाक असून, सद्यस्थितीत तलावांत केवळ जनावरांना पिण्यापुरता पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या केवळ रिमझिम पाऊस पडत असल्याने या पाण्याने तलाव कधी भरणार, याची चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
मृगाच्य नक्षत्रात हलकासा पाऊस झाल्यानंतर दीड महिन्यानी पेरणीलायक पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्याच ओलीवर पेरलेले बी उगवले पण सध्या पावसाअभावी उगवलेले पीक वाळून जात आहे. दमदार पाऊस न झाल्याने या भागातील धोत्री, देवकुरुळी, तामलवाडी, सांगवी, माळुंबा, पांगरधरवाडी हे साठवण तलाव पाण्याअभावी कोरडे ठाक पडले आहेत. मृत पाणी साठ्यावर सध्या जनावरांची तहान भागत आहे. विहिरीचा पाणीसाठा अद्याप वाढला नाही. नाले, ओढे कोरडे आहेत. शेतकरी उसाची मशागत करुन खताची माता देवून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तलावात पाणीसाठा नाही झाल्यास भागातील शेकडो हेक्टर ऊस पाण्याअभावी वाळून जाण्याची भिती आहे. तामलवाडी परिसरात मोठ्या पावसाची गरज असून, चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)
ना गेट आणले, ना दुरूस्ती केली
कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पाऊस संपताच ओढ्यातून वाहणारे पाणी अडविण्यासाठी अद्याप बंधाऱ्याजवळ गेट आणले नाहीत की नादुरुस्ती केली नाही. त्यामुळे यंदाही पाणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चाऱ्याची परजिल्ह्यात विक्री
या भागात चारा प्रश्न गंभीर बनलेला असताना दररोज हजारो पेंड्या कडबा सोलापूर, बार्शीकडे विक्रीसाठी जात असल्याचे दिसत आहे. यावर प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. अशीच विक्री चालू राहिल्यास चारा टंचाई भासण्याची शक्य शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.