शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

उस्मानाबाद : शहरातील रसूलपुरा भागातील आयशा शेख या दोन वर्षीय बालिकेचा तुंबलेल्या नालीत पडल्याने मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे़

उस्मानाबाद : शहरातील रसूलपुरा भागातील आयशा शेख या दोन वर्षीय बालिकेचा तुंबलेल्या नालीत पडल्याने मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे़ या भागातील नाल्यांच्या साफसफाईस रविवारी सकाळपासूनच प्रारंभ करण्यात आला आहे़ अगोदरच अरूंद असलेल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे बिकट अवस्था झाली असून, रस्ता दुरूस्तीकडे मात्र, दुर्लक्ष कायम आहे़शहरातील ख्वॉजानगर भागातील रसुलपुरा परिसरात राहणारे अन्वर शेख यांची दोन वर्षाची मुलगी आयशा हिचा तुंबलेल्या नालीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली होती़ घटनेनंतर नागरिकांमधून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता़ पदाधिकाऱ्यांनी घटनेकडे पाठ फिरविली होती़ तर तहसीलदार व मुख्याधिकारी नंदा यांनी घटनास्थळाला भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन करीत या भागातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते़ या भागात रविवारी सकाळीच पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गटारी साफ करण्याची मोहीम हाती घेतली होती़ त्यावेळी मुख्याधिकारी नंदा यांनी काही काळ या भागात तळ ठोकला होता़ या भागातील बहुतांश गटारी या कचऱ्याने पूर्णत: बुजल्या असून, गटारींची अवस्था बिकट असल्याने पाणी ठिकठिकाणी तुंबत आहे़ अरूंद रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, दुचाकीही या मार्गावरून चालविणे मुश्किल होवून बसले आहे़ तर अनेकांची मोठी वाहने या भागात येवू शकत नसल्याने रात्रीच्यावेळी दर्गाह नजीक लॉक करून लावण्यात येत आहेत़ या भागात पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर असून, काही भागात आठ दिवसातून एकदा तर काही भागात १२ ते १५ दिवसाला पाणी येत असून, अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या़ रसुलपुरा भागात दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून साफसफाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भागातील समस्या पाहता प्रशासनाने स्वच्छतेची मोहीम आठवड्यातून एकदा राबवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. (प्रतिनिधी)